Sunday 29 March 2020

मुलांच्या विकासासाठी कार्यरत असलेला उपक्रमशिल शिक्षक ..समीर देवडे

मुलांच्या विकासासाठी कार्यरत असलेला उपक्रमशिल शिक्षक ..समीर देवडे


लासलगाव - लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित,आय.एस.ओ.9001:2015 मानांकित जिजामाता प्राथमिक शाळा 100 टक्के सेमी इंग्रजी व डिजीटल क्लासरूमयुक्त एकमेव खाजगी प्राथमिक शाळा म्हणून नावारूपाला आली आहे.संस्थेचे संस्थापक लोकनेते कै.दत्ताजी भिकाजी पाटील यांनी स्थापन केलेली शाळा.त्यांचे ब्रीदवाक्य होते -  हाती घ्याल ते तडीस न्या! हेच आज संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.या वाक्याप्रमाणे संस्था व शाळेचा प्रवास पुढे सुरू आहे.या शाळेचे उपक्रमशिल उपशिक्षक समीर देवडे यांचा प्रेरणादाई शैक्षणिक प्रवास - सन 1997 मध्ये इंग्रजी माध्यमातुन डी.एड. ची पदवी प्राप्त करून त्याच वर्षी या शाळेत शैक्षणिक सेवेला सुरूवात केली.आपल्या इंग्रजी विषयाच्या ज्ञानाचा वापर शिक्षकांबरोबरच आपल्या शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना देन्यास सुरूवात केली.विविध कृतियुक्त इंग्रजी बडबड गीते असतिल किंवा इंग्रजी कविता सर्वच यांचे तोंडपाठ आहेत.त्यामुळे मुले देखील शिक्षकांचे अनुकरण करू लागले.जिजामाता शाळा तस म्हटल तर शहरी भागातली पन विद्यार्थी संख्या मात्र तळागाळातली व ग्रामिण भागातील जास्तच आहे. या विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचन व संभाषण करन्यात यशस्वी प्रयत्न केले. बदलत्या तंत्रज्ञानानुसार  इ - लर्निंगचा अध्यापनामधे वापर होणे गरजेचे आहे.संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या डिजीटल क्लासरूममुळे हे शक्य झाले.स्वता  दैनंदिन अध्यापनामध्ये विविध शैक्षणिक व्हिडिओ व डिजिटल अभ्यासक्रमाचा प्रभावीपणे वापर करत आहेत.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी लागुन मुले 100% उपस्थित राहु लागली आहेत.विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे विविध प्रयोग दाखविण्यासाठी संस्थेच्या विद्यालयातील  प्रयोगशाळेत घेवुन जातात.परिसर भेटीचे आयोजन करून विद्यार्थ्यांना परिसराचे ज्ञान मिळवून दिले जाते.हरित सेनेची स्थापना करत वृक्षलागवड करून वृक्ष संवर्धन केले आहे.त्याचे रूपांतर आज बहारदार वृक्षांत झाले आहे.दरवर्षी पालक मेळावा,माता पालक मेळावा, मा.विद्यार्थी मेळावा इत्यादींचे आयोजन केले जाते. कला, कार्यानुभव विषय,आकाश कंदिल, राखी निर्मित्ती अशा विविध कार्यशाळांचे आयोजन,कॅमलिन प्रस्तुत नवनित चित्रकला स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केली जाते.योगासने, सर्वांग सुंदर कवायत, मुक्तहालचाली व विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.मागील पाच वर्षापासुन ते स्पोकन इंग्लिश व ब्रिटिश कौन्सिलचे  राज्य मार्गदर्शक म्हणुन काम करत आहे.त्यांनी माय स्पोकन इंग्लिश बूक हे पुस्तक लिहले असून त्याच्या दोन आवृत्ती प्रकाशित झाल्या आहेत.त्यासाठी राज्याच्या शिक्षण मंत्र्यांचे अभिनंदन पत्र प्राप्त झाले आहे.शिक्षण विभाग व ब्रिटिश कौन्सिल मार्फत त्यांची दोन वेळा इंग्रजी विषयाच्या आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी निवड झाली अाहे.विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध डॉक्टरांची व्याख्याने,लेक वाचवा, लेक शिकवा अभियान ,परिसरातील विविध कवी व लेखक यांची भेट घडवुन आणली जाते.श्यामची आई कथामाला वर्गात राबविली जाते.संस्थेने आयोजीत केलेल्या क्रिडास्पर्धां,विज्ञान प्रदर्शन, मोफत आरोग्य तपासणी शिबिर,सांस्कृतिक कार्यक्रम, आनंद नगरी ,दप्तरमुक्त शनिवार इत्यादी उपक्रम राबविले जातात.ऑगष्ट 2019 मध्ये 
महाराट्र शासन व ब्रिटिश कौन्सिलच्या  तेजस प्रकल्पातील कथा परिवर्तनाच्या पुस्तकात  समीर देवडे यांची इंग्रजी विषयाची यशोगाथा प्रकाशीत करन्यात आलीय. उत्कृष्ट प्रशिक्षक म्हनुन त्यांचा गौरव करन्यात आलाय.गुगल प्ले स्टोअरमधून वर्ग अध्यापनात वेगवेगळ्या शैक्षणिक अ‍ॅप्सचा  वापर ते करतात.उदा.पेपर मर्ज  क्यूब अॅप,क्यु आर कोड स्कॅनर, हॅलो इंग्लिश,सी वर्डस,अॅनिमल फोरडी, ए.बी.सी गेम्स. स्वताच्या  ब्लॉगवर वर्गातील विविध  शैक्षणिक  उपक्रमांची माहिती ते लिहितात.
दैनंदिन अध्यापनात सोशल मिडियाचा सकारात्मक वापर केल्यास त्याचे प्रभावी परिणाम दिसुन येतात.एक वर्षापुर्वी स्वताचा यु-ट्युब चॅनल निर्माण करून.आज राज्य,देश नव्हे तर परदेशातील एक लाखाहुन अधिक शिक्षकांनी त्यांच्या चॅनलवरील विडिओ पाहिलेत. शाळेतील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी विषयाच्या कविता,कृतियुक्त गीते, भाषिक खेळ,संभाषणे, विविध उपक्रम   इत्यादींचे विडिओ  ते यु-ट्यूब वर अपलोड करतात.त्याचा फायदा राज्यातील शिक्षकांना दैनंदिन अध्यापनात होत असुन.सदरचा यु- ट्युब चॅनल नक्कीच राज्यातील शिक्षकांसाठी मार्गदर्शक आहे.
करील मनोरंजन जो मुलांचे ,जडेल नाते प्रभुशी तयाचे या साने गुरूजींच्या सुविचाराने प्रेरीत होवुन ग्रामिण भागातील  मुलांना आनंददायी शिक्षण देन्यासाठी त्यांची धडपड सुरू असते.संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी अभिनंदन पत्र देवुन कार्याचा गौरव केला आहे.तसेच आजवर विविध संस्थाचे राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता.


विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता.



स्वच्छता म्हनजेच  ईश्वरता आहे.आम्ही हा शब्द अनेक वेळा ऐकला आहे.पण आपण याचे  अनुकरण करतो का?स्वच्छता प्रत्येकाने पाळली पाहिजे.चला तर जाणुन घेवुृया स्वच्छते विषयी आनखी काही.
स्वच्छता म्हणजे आपल्या परिसरात घाण नाही,धूळ नाही, डाग नाहीत,दुर्गंधी नाही.स्वच्छतेचे उद्दीष्ट म्हणजे निरामय आरोग्य होय.प्रत्येकाने  घाण व दूषित पदार्थांचा प्रसार टाळणे गरजेचे अाहे.जे काही स्वच्छ आहे त्याची प्रशंसा केली पाहिजे.
स्वच्छतेच्या मदतीने आपण आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य स्वच्छ ठेवू शकतो, ज्यामुळे आपल्याला बरे वाटेल. स्वच्छता शरीर, मन आणि आत्मा स्वच्छ आणि शांत ठेवून चांगल्या चरणाला जन्म देते. स्वच्छता राखणे हे निरोगी जीवनाचा आवश्यक भाग आहे कारण केवळ स्वच्छताच बाह्य आणि अंतर्गत स्वच्छ राहून आपले व्यक्तिमत्त्व सुधारण्यास मदत करते.
ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि एखाद्याने स्वत: ला आणि त्यांच्या आसपासचे वातावरण स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवले पाहिजे. हे मनामध्ये चांगले आणि सकारात्मक विचार देखील आणते जे रोगांची घटना कमी करते.
आपल्या रोजच्या नित्यकर्मांमध्ये स्वच्छता आणि स्वच्छता महत्वाची भूमिका बजावते. हे डेंग्यू, टायफाइड, हिपॅटायटीस आणि डास चावल्यामुळे होणारे इतर आजार इत्यादी धोकादायक आजारांना प्रतिबंधित करते.
कावीळ, कोलेरा, एस्केरियासिस, लेप्टोस्पायरोसिस, रिंगवर्म, स्कॅबीज, स्किटोसोमायसिस, ट्राकोमा इत्यादी आजार दूषित अन्न खाण्यामुळे, दूषित पाणी पिण्यामुळे किंवा अस्वच्छ स्थितीत जगल्यामुळे पसरतात. कचरा देखील दुर्गंधी पसरवते जे सहन करणे कठीण आहे.स्वच्छतेच्या  उपाययोजना न केल्यास कचरा आणि घाण देखील जमा होईल.
स्वच्छतेच्या काही सवयी ज्यांचे पालन व अनुकरण आपण सर्वांनीच केले पाहिजे.
जेवन करन्यापुर्वी किंवा कोणतेही अन्न पदार्थ खाण्यापूर्वी नेहमीच हात स्वच्छ धुवावेत.
खेळल्यानंतर हात धुणे देखील अत्यंत आवश्यक आहे. दिवसातुन आपण कमीतकमी दोनदा दात घासणे गरजेचे आहे.
सार्वजनिक ठिकाणा कोणीही कचरा टाकू नये.प्रत्येकाने  दररोज आंघोळ करणे अनिवार्य आहे.
शिंका येताना आपले नाक झाकणे व खोकताना किंवा  जांभई देताना तोंड झाकणे देखील आवश्यक आहे.
जर एखाद्याच्या घरात कीड आणि उंदीर असतील तर त्यांनी शक्य तितक्या लवकर त्यांची सुटका केली पाहिजे.
शिजवलेले अन्न पदार्थ नेहमी झाकुन ठेवले पाहिजे.शारीरिक स्वच्छतेत शरीर, कपडे, अन्न, घरे आणि बाह्य वातावरणातील घाण आणि अशुद्धतेचे उच्चाटन होते. शरीराची स्वच्छता साबणाने आणि पाण्याने संपूर्ण शरीराच्या आंघोळीद्वारे केली जाते, हात धुण्याची सराव आणि घाणीपासून दूर ठेवते. कपडे स्वच्छ करणे ही एक कपडे धुण्याची प्रक्रिया आहे ज्याद्वारे हाताने हाताने धुणे किंवा मशीन धुणे शक्य आहे. वातावरण स्वच्छ करणे म्हणजे वातावरणातील घाण गोळा करणे आणि योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्याद्वारे, वातावरणाच्या तिन्ही बाबी म्हणजेच, हवा, पाणी आणि जमीन यांची शुद्धता पाळणे. अन्नाची हाताळणी करताना, हात धुण्याद्वारे आणि स्वच्छ पाककला आणि भांडी खाऊन स्वच्छता पाळली पाहिजे जेणेकरून घाणीचा त्रास टाळता येईल. घरे आणि घरातील वस्तू देखील स्वच्छ ठेवल्या पाहिजेत विशेषत: राहण्याची जागा, स्वयंपाकघर, शयनगृह आणि स्नानगृहे कारण आपण घरातील वातावरणाशी बर्‍याचदा संवाद साधतो
स्वच्छतेचे महत्त्व:
स्वच्छता हा  मानवी जीवनाचा एक महत्वाचा घटक आहे.मानवतेच्या कल्याण आणि अस्तित्वामध्ये शारीरिक स्वच्छता महत्त्वपूर्ण आहे.स्वच्छता ही व्यक्ती आणि समाजातील आरोग्यासाठी  आवश्यक आहे.आरोग्य आणि स्वच्छता एकमेकांशी संबंधित असतात आणि एकमेकांवर प्रभाव पाडतात. तब्येत चांगली राहण्यासाठी स्वच्छतेचा सराव केला पाहिजे.स्वच्छता ही मुळात चांगले आरोग्य राखण्याची आणि स्वच्छतेद्वारे रोग रोखण्याची प्रथा आहे.शरीराची स्वच्छता, अन्न आणि वातावरणाची स्वतंत्र आरोग्यासाठी निरोगीपणा आहे. स्वच्छतेमुळे रोगापासून बचाव होतो कारण घाण सहसा संसर्गजन्य रोगजनकांना रोखुन  ठेवते ज्यामुळे जेव्हा ते मनुष्यासमोर येतात तेव्हा त्यांना रोगाचा प्रादुर्भाव होतो.आरोग्य व्यावसायिकांकडून आरोग्यविषयक पद्धतींचा जास्त सल्ला दिला जातो कारण रोगाचा प्रतिकार करणे आणि उपचार घेण्यापेक्षा रोग रोखणे चांगले. आरोग्यदायी प्रथा अंगिकारनार्या व्यक्ती दिर्घआयुष्य  जगतात कारण ते आजारांपासून मुक्त असतात.
शेवटी, व्यक्तींच्या जीवनात स्वच्छता अटळ आहे. कार्यक्षमता आणि विकास टिकवून ठेवण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याभोवती असलेली प्रत्येक गोष्ट स्वच्छतेसाठी व्यवहार्य आहे.  मानवी सुसंवाद आणि आरोग्यासह,सुरक्षा आणि आयुष्याच्या बाबतीत पर्यावरणाशी संबंधित शारीरिक स्वच्छता फायदेशीर आहे.





Monday 24 February 2020

मुलांच्या सर्वांगिन विकासाठी दप्तरमुक्त अभियान राबविनारी शाळा.

मुलांच्या सर्वांगिन विकासाठी दप्तरमुक्त अभियान राबविनारी शाळा.




लासलगाव - लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित,आय.एस.ओ.9001:2015 मानांकित जिजामाता प्राथमिक शाळा 100 टक्के सेमी इंग्रजी व डिजीटल क्लासरूमयुक्त एकमेव खाजगी प्राथमिक शाळा म्हणून नावारूपाला आली आहे.संस्थेचे संस्थापक लोकनेते कै.दत्ताजी भिकाजी पाटील यांनी स्थापन केलेली शाळा.त्यांचे ब्रीदवाक्य होते -  हाती घ्याल ते तडीस न्या! हेच आज संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.या वाक्याप्रमाणे संस्था व शाळेचा प्रवास पुढे सुरू आहे.या शाळेत परिसरातील गरीब, कष्टकरी वर्गाचे, सर्वसामान्य पालकांचे 600 पेक्षा अधिक मुले शिक्षण घेतात.जे पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आर्थिक परिस्थितीमुळे प्रवेश घेवु  शकत नाही.अशा विद्यार्थ्यांसाठी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील,सचिव संजय पाटील यांनी  शाळा 100% सेमी इंग्रजी केली.सर्वच विद्यार्थ्यांना याचा फायदा होत आहे.इंग्रजी माध्यमाच्या शाळेतुन दरवर्षी अनेक मुले या शाळेत प्रवेश घेत आहेत.ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र,आर.टी.ई.कायदा यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होणे अपेक्षित आहे.तसेच विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करणे गरजेचे व कायद्याने बंधनकारक आहे.यासाठी प.स.सदस्य रंजनाताई पाटिल, संचालिका निताताई पाटील ,शंतनु पाटील शाळेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील, मुख्याध्यापक अनिस काझी यांनी प्रभावी अंमलबजावनी करत दोन वर्षापुर्वी राज्यात पथदर्शी ठरलेला उपक्रम म्हनजे 'दप्तरमुक्त शनिवार' हा उपक्रम सुरु केला.2020 हे या उपक्रमाचे सलग दुसरे वर्ष आहे.सेमी इंग्रजी सोबतच इंग्रजी विषयात विद्यार्थ्यांची रूची वाढावी म्हनुन अभ्यासक्रमा व्यतिरिक्त विविध कृतियुक्त इंग्रजी बडबड गीते म्हनुन घेतली जातात. सर्व मुलांच्या  इंग्रजी कविता  तोंडपाठ आहेत.शिक्षक स्वता अध्यापनात कृतीचा पुरेपुर वापर करतात.त्यामुळे मुले देखील शिक्षकांचे अनुकरण करतात.तसेच इंग्रजी वाचन व संभाषण प्रभावीपणे करता यावे यासाठी यशस्वी प्रयत्न केले जातात.शाळेचे उपशिक्षक समीर देवडे यांनी लिहिलेल्या माय स्पोकन इंग्लिश बुक या पुस्तकाचा देखील विद्यार्थी व शिक्षकांना दैनंदिन अध्यापनात उपयोग होत आहे.बदलत्या तंत्रज्ञानानुसार  इ - लर्निंगचा अध्यापनामधे वापर होणे गरजेचे आहे.संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या डिजीटल क्लासरूममुळे हे शक्य झाले.सर्वच शिक्षक दैनंदिन  अध्यापनामध्ये विविध शैक्षणिक व्हिडिओ व डिजिटल अभ्यासक्रमाचा प्रभावीपणे वापर करत आहेत.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी लागुन मुले 100% उपस्थित राहु लागली आहेत.पारंपारिक अध्यापनाबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अध्यापनात करतांना शनिवारी विविध कार्यशाळा आयोजीत करुन विद्यार्थ्यांना गुगल प्ले स्टोअरमधून विविध शैक्षणिक अ‍ॅप्सचा  वापर प्रात्याक्षिकासह दाखविन्यात येतो. उदा.पेपर मर्ज  क्यूब अॅप,क्यु आर कोड स्कॅनर, हॅलो इंग्लिश,ए.बी.सी. वर्डस,अॅनिमल फोरडी, ए.बी.सी गेम्स,युटबवरील विविध व्हिडिओ प्रोजेक्टरवर पाहणे.याद्वारे दैनंदिन अध्यापनात सोशल मिडियाचा सकारात्मक वापर केल्याने त्याचे प्रभावी परिणाम दिसुन आलेत.शाळेने एक  वर्षापुर्वी स्वताचा यु-ट्युब चॅनल निर्माण केलेला आहे..आज राज्य,देश नव्हे तर परदेशातील एक लाखाहुन अधिक शिक्षकांनी शाळेच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहिलेत. शाळेतील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी विषयाच्या कविता,कृतियुक्त गीते, भाषिक खेळ,संभाषणे, विविध उपक्रम   इत्यादींचे विडिओ  ते यु-ट्यूब वर अपलोड करतात.त्याचा फायदा राज्यातील शिक्षकांना दैनंदिन अध्यापनात होत असुन.सदरचा यु- ट्युब चॅनल नक्कीच राज्यातील शिक्षकांसाठी मार्गदर्शक आहे.सोशल मिडियाचा प्रभावी वापर करत शिक्षक शाळेत राबविलेले उपक्रम प्रसारित करतात.शाळेने प्रत्येक इयत्तेच्या पालकांसाठी महिला व पुरूष असे स्वतंत्र वाटसअप ग्रुप केलेले आहेत.त्याद्वारे सुचना, शाळेत राबिविलेले विविध उपक्रम पालकांपर्यंत पोहचविले जातात.
विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे विविध प्रयोग दाखविण्यासाठी संस्थेच्या विद्यालयातील  प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र असलेल्या प्रयोगशाळेत नेवुन तज्ञ शिक्षकांच्या मदतीने प्रयोग करून दाखविले जातात.यामध्ये विविध परिसर भेटीचे आयोजन करून विद्यार्थ्यांना परिसरातील पिके,नदी,बंधारे, ऐत्याहासिक वास्तु,सर्व धार्मिक प्रार्थनास्थळे यांची माहिती व ज्ञान मिळवून दिले जाते.हरित सेनेची स्थापना करत वृक्षलागवड करून वृक्ष संवर्धन केले आहे.शाळेतील विद्यार्थी सुटीनंतर घरी जाताना रोज बाटलीतील शिल्लक पानी झाडांना टाकतात.त्याद्वारे पान्याचा सद्उपयोग व वृक्षसंवर्धन केले जाते.दरवर्षी पालक मेळावा,माता पालक मेळावा, मा.विद्यार्थी मेळावा इत्यादींचे आयोजन केले जाते. कला, कार्यानुभव विषय,आकाश कंदिल, राखी निर्मित्ती अशा विविध कार्यशाळांचे आयोजन केले जाते.शाळेने नुकतेच युनिस्को क्लबचे सदस्यत्व प्राप्त केले आहे.त्याद्वारे आयोजीत एशियन पिंकी फेस्टा आंतराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे.इयत्ता चौथीची विद्यार्थीनी शिफा समीर पठाण हिच्या चित्राची निवड राष्ट्रीय स्तरावर झाली आहे.कॅमलिन प्रस्तुत नवनित चित्रकला स्पर्धा देखील शाळेत यशस्वीपणे आयोजित केली जाते.दप्तरमुक्त शनिवार उपक्रमा अंतर्गत योगाचार्य यांच्या मार्गदर्शनाने योगासने, सर्वांग सुंदर कवायत, मुक्तहालचाली घेतल्या जातात. तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध डॉक्टरांची व्याख्याने,वैघकिय तपासणी,दंत व नेत्र तपासणी शिबिरे आयोजीत केली जातात.तंबाखुमुक्त शाळा अभियानात तंबाखुमुक्त शाळेचा मान मिळालेला आहे.पालकांना देखील तंबाखुमुक्त करन्यात शाळेचा सिंहाचा वाटा आहे.लेक वाचवा, लेक शिकवा अभियान ,परिसरातील नामवंत विविध कवी व लेखक,गायक,कलावंत,पोलीस,पत्रकार , डॉक्टर  अशा विविध व्यावसायिक यांची भेट घडवुन आणली जाते.त्यांच्या कार्याचे प्रात्याक्षिक दाखविले जाते.सैनिक व पोलीसांसाठी रक्षाबंधन उपक्रम दरवर्षी राबविला जातो.श्यामची आई कथामाला  राबविली जाते. विविध शैक्षणिक चित्रपट मोठ्या चित्रपटगृहात संस्थेच्या मदतीने मोफत दाखविले जातात.विविध थोरपुरूषांच्या जयंती, निमित्ताने वकृत्व स्पर्धा आयोजीत करुन विद्यार्थ्यांना रोख पारितोषीक व शैक्षणिक साहित्य बक्षिस  दिले जातात. संस्था अंतर्गत आयोजीत केलेल्या क्रिडास्पर्धां,विज्ञान प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, आनंद नगरी  यात शाळेचा सक्रिय सहभाग असतो. संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील व संचालक मंडळ वेळोवेळी शाळेला भेटी देऊन अडीअडचणी समजून घेतात मुख्याध्यापक व शिक्षकांना मार्गदर्शन करतात. शाळेला नासिक विभागाचे  शिक्षण उपसंचालक , जिल्हा शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, या मान्यवरांनी भेटी देऊन शालेय उपक्रमांचे कौतुक केले आहे. लासलगाव बिटाचे विस्तार अधिकारी वसंत गायकवाड व पालकवर्ग यांचेही मार्गदर्शन मिळत असते.
मुलांच्या सर्वांगिन विकासाठी दप्तरमुक्त अभियान राबविनारी शाळा.


लासलगाव - लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित,आय.एस.ओ.9001:2015 मानांकित जिजामाता प्राथमिक शाळा 100 टक्के सेमी इंग्रजी व डिजीटल क्लासरूमयुक्त एकमेव खाजगी प्राथमिक शाळा म्हणून नावारूपाला आली आहे.संस्थेचे संस्थापक लोकनेते कै.दत्ताजी भिकाजी पाटील यांनी स्थापन केलेली शाळा.त्यांचे ब्रीदवाक्य होते -  हाती घ्याल ते तडीस न्या! हेच आज संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.या वाक्याप्रमाणे संस्था व शाळेचा प्रवास पुढे सुरू आहे.या शाळेत परिसरातील गरीब, कष्टकरी वर्गाचे, सर्वसामान्य पालकांचे 600 पेक्षा अधिक मुले शिक्षण घेतात.जे पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आर्थिक परिस्थितीमुळे प्रवेश घेवु  शकत नाही.अशा विद्यार्थ्यांसाठी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील,सचिव संजय पाटील यांनी  शाळा 100% सेमी इंग्रजी केली.सर्वच विद्यार्थ्यांना याचा फायदा होत आहे.इंग्रजी माध्यमाच्या शाळेतुन दरवर्षी अनेक मुले या शाळेत प्रवेश घेत आहेत.ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र,आर.टी.ई.कायदा यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होणे अपेक्षित आहे.तसेच विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करणे गरजेचे व कायद्याने बंधनकारक आहे.यासाठी प.स.सदस्य रंजनाताई पाटिल, संचालिका निताताई पाटील ,शंतनु पाटील शाळेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील, मुख्याध्यापक अनिस काझी यांनी प्रभावी अंमलबजावनी करत दोन वर्षापुर्वी राज्यात पथदर्शी ठरलेला उपक्रम म्हनजे 'दप्तरमुक्त शनिवार' हा उपक्रम सुरु केला.2020 हे या उपक्रमाचे सलग दुसरे वर्ष आहे.सेमी इंग्रजी सोबतच इंग्रजी विषयात विद्यार्थ्यांची रूची वाढावी म्हनुन अभ्यासक्रमा व्यतिरिक्त विविध कृतियुक्त इंग्रजी बडबड गीते म्हनुन घेतली जातात. सर्व मुलांच्या  इंग्रजी कविता  तोंडपाठ आहेत.शिक्षक स्वता अध्यापनात कृतीचा पुरेपुर वापर करतात.त्यामुळे मुले देखील शिक्षकांचे अनुकरण करतात.तसेच इंग्रजी वाचन व संभाषण प्रभावीपणे करता यावे यासाठी यशस्वी प्रयत्न केले जातात.शाळेचे उपशिक्षक समीर देवडे यांनी लिहिलेल्या माय स्पोकन इंग्लिश बुक या पुस्तकाचा देखील विद्यार्थी व शिक्षकांना दैनंदिन अध्यापनात उपयोग होत आहे.बदलत्या तंत्रज्ञानानुसार  इ - लर्निंगचा अध्यापनामधे वापर होणे गरजेचे आहे.संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या डिजीटल क्लासरूममुळे हे शक्य झाले.सर्वच शिक्षक दैनंदिन  अध्यापनामध्ये विविध शैक्षणिक व्हिडिओ व डिजिटल अभ्यासक्रमाचा प्रभावीपणे वापर करत आहेत.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी लागुन मुले 100% उपस्थित राहु लागली आहेत.पारंपारिक अध्यापनाबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अध्यापनात करतांना शनिवारी विविध कार्यशाळा आयोजीत करुन विद्यार्थ्यांना गुगल प्ले स्टोअरमधून विविध शैक्षणिक अ‍ॅप्सचा  वापर प्रात्याक्षिकासह दाखविन्यात येतो. उदा.पेपर मर्ज  क्यूब अॅप,क्यु आर कोड स्कॅनर, हॅलो इंग्लिश,ए.बी.सी. वर्डस,अॅनिमल फोरडी, ए.बी.सी गेम्स,युटबवरील विविध व्हिडिओ प्रोजेक्टरवर पाहणे.याद्वारे दैनंदिन अध्यापनात सोशल मिडियाचा सकारात्मक वापर केल्याने त्याचे प्रभावी परिणाम दिसुन आलेत.शाळेने एक  वर्षापुर्वी स्वताचा यु-ट्युब चॅनल निर्माण केलेला आहे..आज राज्य,देश नव्हे तर परदेशातील एक लाखाहुन अधिक शिक्षकांनी शाळेच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहिलेत. शाळेतील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी विषयाच्या कविता,कृतियुक्त गीते, भाषिक खेळ,संभाषणे, विविध उपक्रम   इत्यादींचे विडिओ  ते यु-ट्यूब वर अपलोड करतात.त्याचा फायदा राज्यातील शिक्षकांना दैनंदिन अध्यापनात होत असुन.सदरचा यु- ट्युब चॅनल नक्कीच राज्यातील शिक्षकांसाठी मार्गदर्शक आहे.सोशल मिडियाचा प्रभावी वापर करत शिक्षक शाळेत राबविलेले उपक्रम प्रसारित करतात.शाळेने प्रत्येक इयत्तेच्या पालकांसाठी महिला व पुरूष असे स्वतंत्र वाटसअप ग्रुप केलेले आहेत.त्याद्वारे सुचना, शाळेत राबिविलेले विविध उपक्रम पालकांपर्यंत पोहचविले जातात.
विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे विविध प्रयोग दाखविण्यासाठी संस्थेच्या विद्यालयातील  प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र असलेल्या प्रयोगशाळेत नेवुन तज्ञ शिक्षकांच्या मदतीने प्रयोग करून दाखविले जातात.यामध्ये विविध परिसर भेटीचे आयोजन करून विद्यार्थ्यांना परिसरातील पिके,नदी,बंधारे, ऐत्याहासिक वास्तु,सर्व धार्मिक प्रार्थनास्थळे यांची माहिती व ज्ञान मिळवून दिले जाते.हरित सेनेची स्थापना करत वृक्षलागवड करून वृक्ष संवर्धन केले आहे.शाळेतील विद्यार्थी सुटीनंतर घरी जाताना रोज बाटलीतील शिल्लक पानी झाडांना टाकतात.त्याद्वारे पान्याचा सद्उपयोग व वृक्षसंवर्धन केले जाते.दरवर्षी पालक मेळावा,माता पालक मेळावा, मा.विद्यार्थी मेळावा इत्यादींचे आयोजन केले जाते. कला, कार्यानुभव विषय,आकाश कंदिल, राखी निर्मित्ती अशा विविध कार्यशाळांचे आयोजन केले जाते.शाळेने नुकतेच युनिस्को क्लबचे सदस्यत्व प्राप्त केले आहे.त्याद्वारे आयोजीत एशियन पिंकी फेस्टा आंतराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे.इयत्ता चौथीची विद्यार्थीनी शिफा समीर पठाण हिच्या चित्राची निवड राष्ट्रीय स्तरावर झाली आहे.कॅमलिन प्रस्तुत नवनित चित्रकला स्पर्धा देखील शाळेत यशस्वीपणे आयोजित केली जाते.दप्तरमुक्त शनिवार उपक्रमा अंतर्गत योगाचार्य यांच्या मार्गदर्शनाने योगासने, सर्वांग सुंदर कवायत, मुक्तहालचाली घेतल्या जातात. तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध डॉक्टरांची व्याख्याने,वैघकिय तपासणी,दंत व नेत्र तपासणी शिबिरे आयोजीत केली जातात.तंबाखुमुक्त शाळा अभियानात तंबाखुमुक्त शाळेचा मान मिळालेला आहे.पालकांना देखील तंबाखुमुक्त करन्यात शाळेचा सिंहाचा वाटा आहे.लेक वाचवा, लेक शिकवा अभियान ,परिसरातील नामवंत विविध कवी व लेखक,गायक,कलावंत,पोलीस,पत्रकार , डॉक्टर  अशा विविध व्यावसायिक यांची भेट घडवुन आणली जाते.त्यांच्या कार्याचे प्रात्याक्षिक दाखविले जाते.सैनिक व पोलीसांसाठी रक्षाबंधन उपक्रम दरवर्षी राबविला जातो.श्यामची आई कथामाला  राबविली जाते. विविध शैक्षणिक चित्रपट मोठ्या चित्रपटगृहात संस्थेच्या मदतीने मोफत दाखविले जातात.विविध थोरपुरूषांच्या जयंती, निमित्ताने वकृत्व स्पर्धा आयोजीत करुन विद्यार्थ्यांना रोख पारितोषीक व शैक्षणिक साहित्य बक्षिस  दिले जातात. संस्था अंतर्गत आयोजीत केलेल्या क्रिडास्पर्धां,विज्ञान प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, आनंद नगरी  यात शाळेचा सक्रिय सहभाग असतो. संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील व संचालक मंडळ वेळोवेळी शाळेला भेटी देऊन अडीअडचणी समजून घेतात मुख्याध्यापक व शिक्षकांना मार्गदर्शन करतात. शाळेला नासिक विभागाचे  शिक्षण उपसंचालक , जिल्हा शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, या मान्यवरांनी भेटी देऊन शालेय उपक्रमांचे कौतुक केले आहे. लासलगाव बिटाचे विस्तार अधिकारी वसंत गायकवाड व पालकवर्ग यांचेही मार्गदर्शन मिळत असते.

मराठी राजभाषा दिन.


मराठी राजभाषा दिन.

दि.27 फेब्रुवारी हा दिवस सबंध जगभरात मराठी भाषिक मराठी दिन म्हनुन साजरा करतात.या दिवसालाच अन्य नावे :मराठी भाषा दिवस,मराठी राजभाषा दिन ,मराठी गौरव दिन असे संबोधले जाते.ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो.भारतीय ज्ञानपिठ न्यासाकडुन १९८७ साली त्यांना मराठी वाडमयातील योगदाना बद्दल ज्ञानपीठ पुरस्कार बहाल केला.ज्ञानपीठ पुरस्कार भारतीय ज्ञानपीठ न्यासाद्वारे भारतीय साहित्यासाठी दिलेला सर्वोच्च पुरस्कार आहे.या पुरस्कारमध्ये रोख रक्कम,प्रशस्तिपत्र आणि वाग्देवीची  कांस्य प्रतिमा भेट दिली जाते.भारतातुन मराठी साहित्याला पहिला ज्ञानपिठ पुरस्कार इ.स.1974 मध्ये लेखक विष्णु सखाराम खांडेकर यांना ययाती या कांदबरीसाठी देन्यात आला.त्यांनतर कवीवर्य विष्णु वामन शिरवाडकर  (कुसुमाग्रज) यांना नटसम्राट या नाट्यासाठी देन्यात आला.नंतर इ.स.2003 मध्ये विं.दा.करंदिकर यांना देन्यात आला.अलिकडे इ.स.2014 मध्ये लेखक भालचंद्र वनाजी नेमाडे यांना हा पुरस्कार देन्यात आला.त्यानंतर शासनाने कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा दिवस मराठी  गौरव दिन म्हणून जाहीर केला.
वि.वा.शिरवाडकर यांना लहानपणापासून लिहण्याची आवड होती.त्यांनी बालपनी कविता लिहण्यास सुरूवात केली.पुढे कथा,कादंबरी,नाटक, ललित वाड्यमयातील नावाजलेलेली साहित्य रचना त्यांच्या लिखानातून अवतरत राहिली.त्यांच्या अनोख्या साहित्यासाठी १९७४ साली नटसम्राट या नाटकासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कारमिळाला.भारत सरकारने १९९१ मध्ये त्यांना पद्मभूषणपुरस्काराने गौरविन्यात आले आहे.असे अनेकविध पुरस्कार त्यांच्या साहित्याला प्राप्त झाले आहे.त्यांचे स्मारक आपल्या नासिकमध्ये आहे.वाडमयाचा प्रचार व प्रसार वेगवेगळ्या माध्यमातुन व्हावा या उदात्त हेतुने त्यांनी आपले लिखान केले आहे.त्यात नाट्यलेखन,कविता,गीते,कांदबरी,कथा यांचा समावेश आहे.
मराठी भाषा संवर्धनासाठी अनेकविध उपयायोजना शासनाकडुन राबविल्या जातात.परंतु मराठी भाषिक,मराठी माध्यमाच्या शाळेतील शिक्षक या नात्याने भारत देशात मराठी विषय व मराठी माध्यमांच्या शाळेत  शिकविन्याचे,ज्ञानदानाचे कार्य करनार्या प्रत्येक शिक्षकाचे हे आद्य कर्तव्य आहे.आपण मराठी भाषा संवर्धनासाठी तन,मन,धनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.यासाठी अनेक विविध उपक्रम आपण प्राथमिक ते महाविद्यालयीन  स्तरावर राबवु शकतो.उदा.दैनंदिन पाठ्यक्रमा व्यतिरिक्त  विविध प्रकारचे मराठी नाटके मुलांकडुन करून घेणे.वेगवेगळ्या नाट्य स्पर्धांमद्ये शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे.शालेय स्तरावर अथवा तालुका,जिल्हा स्तरावर  अशा स्पर्धांचे आयोजन करणे.उदा.जिल्हा विज्ञान अध्यापक संघाच्यावतीने दरवर्षी विज्ञान नाट्य स्पर्धा आयोजीत केल्या जातात.यात प्रत्येक  शाळेने सहभागी होने गरजेचे आहे.विविध शैक्षणिक, धार्मिक  चित्रपट मुलांना दाखविणे.शास्त्रीय संगीत ऐकविणे,तशा प्रकारच्या संधी मुलांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.शाळा स्तरावर विद्यार्थी - शिक्षक काव्य संमेलन आयोजीत करण.औरंगाबाद येथुन दरमहा प्रकाशित होणारे शासनमान्य जीवन गौरव मासिक दरवर्षी अशाप्रकारचे राज्यस्तरीय साहित्य संमेलन व काव्य संमेलन आयोजीत करत आहे.संपादक रामदास वाघमारे सर,सह संपादक शिक्षिका वैशाली भामरे, रूपाली कराड यांचे यात फार मोठे योगदान आहे.या मासिकात शिक्षक विद्यार्थ्यांच्या मराठीतील कविता, लेख  प्रकाशित केले जातात.अशा प्रकारच्या अनेक संस्था कार्यरत आहे.त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवुन देणे शिक्षकांचे कर्तव्य आहे.निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा आणि मराठी भाषेला उत्तम दिशा देण्याचे अनेकविध  कार्यक्रम आपण आयोजित करू शकतो.लासलगावचा मराठी भाषा संवर्धन व विकासाचा थोडक्यात आढावा घेणे यानिमित्ताने औचित्याचे ठरेल.वनस्थळी (कलांजली) संस्था शास्त्री नगर, लासलगाव यांचे तर्फे दरवर्षी राजभाषा दिनाच्या औचित्याने कवी संमेलन आयोजीत करन्यात येते.यावर्षी देखील जेष्ठ साहितीक मराठीचे प्राध्यापक  शिरीष गंधे यांचे अध्यक्षतेखाली काव्य संमेलन संपन्न होत आहे.ज्यात अनेक शिक्षक व विद्यार्थी आपल्या कविता सादर करनार आहे.अशा प्रकारचे उपक्रम आपण शाळा स्तरावर देखील राबवु शकतो.लासलगाव मराठी साहित्य परिषद नेहमी नवोदित लेखक व कवी यांना मार्गदर्शन करून नविन लिखानासाठी शुभेच्छा देत असते.लासलगाव येथील रहिवाशी महाराष्ट्रातील  ख्यातन्याम कवी,गीतकार प्रकाश होळकर यांचे मराठी साहित्य  क्षेत्रात मोठे योगदान आहे.अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे.त्यांचे अनेक कवीता संग्रह प्रकाशित झाले आहेत.दुरदर्शनवर देखील अनेक कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. इतिहास अभ्यासक संजय बिरार यांचे लेखन अतिशय उत्कृष्ट आहे. त्यांचे नविन पुस्तक लासलगावची बखर प्रकाशनाच्या वाटेवर आहे.अनेक लेख व परमपूज्य भगरी बाबांवर त्यांनी माहिती संकलित केली आहे. तसेच प्रा.किशोर गोसावी यांनी देखील लासलगावचे आराध्यदैवत परमपूज्य भगरी बाबा दिव्यदर्शन या पुस्तकाचे लेखन केलेल आहे. 
नवोदित लेखक शिवाजी विसपुते यांच्या विधिलिखीत या कादंबरीने देखील अनेक पुरस्कार मिळविले आहेत. नुकताच त्यांच्या या कादंबरीला समृद्धी प्रकाशन संस्था हिंगोलीच्या वतीने दिला जाणारा 'राज्यस्तरीय संत नामदेव कादंबरी साहित्य पुरस्कार 2019' मिळाला आहे.झी युवा सिंगर एक नंबर फेम गायक विंचुर येथील  जगदिश चव्हाण हा लासलगाव शिक्षण सहायक मंडळ संचलित लोकनेते दत्ताजी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी आहे.संगीत व गीत गायनात सुवर्णा क्षिरसागर यांनी अनेक विद्यार्थी घडविले आहेत.नुकताच त्यांचा डिडी सह्याद्री या शासकीय वाहिनीवर संगिताचा कार्यक्रम प्रसारित झाला आहे.मराठी संगीत क्षेत्रात ग्रामिण भागात त्यांचे मोठे योगदान आहे.संगितकार बाबासाहेब चव्हाणके यांचे विद्यार्थी देखील मराठी गीतगायनात राष्ट्रिय स्तरावर चमकले आहेत.महेंद्र फुलपगार, तुषार देवरे असे अनेक नामवंत कलाकार ग्रामिण शहरी भागात मराठी भाषा,मराठी संगीत,गीतगायन यात आपले योगदान देत आहे.ते नक्कीच प्रेरणादाई आहे.अरुण भांबारे यांचे इतिहासा वरील लेख वाचनीय व माहितीपुर्न असतात.त्यांची लेखन शैली अतिशय प्रभावी आहे.कवी राजेंद्र  होळकर यांचे देखील साहित्य क्षेत्रात व मराठी भाषा संवर्धनासाठी खुप मोठे योगदान आहे.लासलगाव समाचार या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातुन ते नवोदित लेखक, कवी यांचे लेख व कविता यांना नेहमीच प्रसिद्धी देत असतात.शेतीतज्ञ सचिन होळकर यांचे शेतीविषयक मार्गदर्शनपर लेख अनेक वृत्तपत्रे व मासिके यात प्रकाशित झाले आहे.पत्रकार रामभाऊ आवारे,समीर पठाण,निलेश देसाई व अन्य सर्वच पत्रकार यांचे अनेक विषाावरील नाविन्यपुर्न लेख प्रकाशित झालेले आहेत.  ऋषीकेश जोशी गुरू यांचे आपले सण आपले उत्सव व इतिहासपर लेख माहितीपुर्न व मार्गदर्शन करनारे असतात.ब्राम्हण समाजाच्या राज्य कार्याध्यक्षा स्मिता कुलकर्णी यांचे स्त्री सक्षमीकरणावरील लेख मार्गदर्शक असतात.कवी शिक्षक कैलास भामरे,नुमान शेख,गुरुदेव गांगुर्डे यांच्या कविता महाराष्ट्र राज्य साहित्य संमेलनात सादर झालेल्या आहेत.त्यांचे मार्गदर्शनाने अनेक विद्यार्थी कविता लेखन करत आहे.अशा प्रकारे लासलगाव परिसरातील विविध व्यक्तींचे मराठी भाषा संवर्धनासाठी अतोनात प्रयत्न सुरू आहेत.मराठी राजभाषा दिनाच्या आपण सर्व वाचकांना हार्दिक  शुभेच्छा.लेखन व वाचन संस्कृती जोपासण्यासाठी कटिबद्घ राहुया.

समीर देवडे 
उपशिक्षक जिजामाता प्राथमिक शाळा,लासलगाव