ENGLISH KNOWLEDGE HUB
  • Home
  • ELTAI
  • CPD
  • E LIBRARY
  • MY ACHIEVEMENT.
  • TEACHING AIDS.
  • BRITISH COUNCIL.
  • MY YOUTUBE CHANEL.
  • SPOKEN ENG.VIDEOS.
  • TEJAS TAG VIDEOS.
  • MOTIVATIONAL VIDEOS.
  • TAG MEETINGS.
  • ENGLISH POEMS
  • DAILY NEWS PAPER
  • MORAL STORIES
  • SPOKEN ENGLISH
  • EDU.WEBSITES.
  • TEJAS TAG FILMS.
  • WARMERS
  • AINET NAGPUR
  • SCHOOL NEWS
  • SCHOOL ACTIVITIES
  • My Written Articles.
  • E - LEARNING
  • SOCIAL WORK
  • TEAJAS CHANGE STORY BOOK
  • NCN NEWS LINK 2019

My Written Articles.


 10)  तंत्रज्ञानाद्वारे अध्यापन

 लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित आय.एस.ओ.मानांकित जिजामाता प्राथमिक शाळा लासलगाव या शाळेतील सर्वच  शिक्षक दैनंदिन अध्यापनात आयय.सी.टी.चा प्रभावीपणे वापर करतात.मी स्वता  यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापिठातुन माहिती तंत्रज्ञानाची पदवी मिळविली आहे.ब्रिटिश कौन्सिल सोबत काम करन्याचा आठ वर्षाचा अनुभव होत.गेल्या पाच वर्षापुर्वी आमच्या शाळेत संस्थेच्या मदतीने डिजीटल क्सालरूम सुरू करन्यात आला.तिथुन दैनंदिन अध्यापनात प्रोजेक्टरचा वापर सुरू करन्यात आला.विविध शैक्षणिक व्हिडिओ,लघुपट पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना दाखविली जात आहे.पाठ्यक्रमावर आधारीत माझे स्वनिर्मित व्हिडिओ युटुबवर  अपलोड केले जात आहेत.त्यात विविध कविता,भाषिक खेळ,सांस्कृतिक कार्यक्रम,टीवी वरील शाळेच्या उपक्रमाच्या बातम्या  यांचा समावेश आहे.आता पर्यंत दिड लाखाहुन अधिक लोकांनी याचा लाभ  घेतला आहे.राज्यतील अनेक शिक्षक या व्हिडिओंचा त्यांच्या दैनंदिन अध्यापनात वापर करत आहे.ब्लॉगच्या माध्यमातुन विविध माहिती शिक्षक व विद्यार्थी यांचे पर्यंत पोहचविली जात आहे.ब्लॉगला आतापर्यंत 47,000 व्हिजीट आहेत.
याव्यतिरिक्त विविध शैक्षणिक अॅपचा वापर प्रभावीपणे दैनंदिन अध्यापनात केला जात आहे.अॅनिमल फोरडी,बोलो इंग्लिश,सुर्यमाला दाखविन्यासाठी क्युबचा वापर याहुन अनेकविध शैक्षणिक अॅप विद्यार्थी व पालक वापरत आहेत.शिक्षण क्षेत्राताल विविध तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना स्काईपी,झुम मिटिंगच्या माध्यमातुन मिळवुन दिले जाते.लेखक आपल्या भेटीला अंतर्गत याच तंत्रज्ञाचा वापर केला गेला आहे.परदेशातील विद्यार्थ्यां बरोबर संवाद साधला आहे.पीपीटीच्या सहाय्याने विविध शैक्षाणिक घटकांचे सादरीकरण केले जाते.यासाठी प्राजेक्टरचा वापर केला जातो.अनेक विद्यार्थ्यांना संगणकाचे प्राथमिक प्रशिक्षण दिलेले आहे त्यामुळे बरेच विद्यार्थी सहजपणे घरी संगणक व लॅपटॉप हातळत आहेत. विद्यार्थ्यांकरिता  विषयवार गृहपाठ पालकांच्या वाटसअपग्रुपवर दिला जातो.गुगल फॉर्म व टेस्टमोज या सॉफ्टवेअरचा वापर करत विविध ऑनलाईन चाचण्या बनवुन त्याची लिंक पालक व्हाटसअप ग्रुपवर पाठवली जाते.विद्यार्थ्यांना चाचणी सोडवताना आपले उत्तर चुक की बरोबर हे लगेच समजते.चाचणी सबमिट केल्यानंतर मिळालेले गुण लगेच समजतात.विद्यार्थ्यांच्या गुणवतावाढीसाठी दैनंदिन अध्यापनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे काळाची गरज आहे.हे युग डिजीटल साक्षरतेचे आहे.तत्रज्ञानाची कास धरूया,विद्यार्थी व राष्ट्र विकास घडवुया.

श्री.समीर केदु देवडे (लेखक)
शाळा - जिजामाता प्राथमिक शाळा,लासलगाव ता.निफाड जि.नाशिक.
पत्ता - मु.पो.लासलगाव राधानगर ता.निफाड जि.नाशिक
पिन.422306
Mo.No.7588556717,8668392591
Email - sameerdeode@gmail.com

  9) कोरोना सारख्या महामारीत स्वच्छतेचे सेवक ठरताय जीवनदुत.

कोरोना कोविड 19 या साथीच्या आजाराचे सबंध जगभरात थैमान सुरू आहे.9 मार्चला महाराष्ट्रात पहिला रूग्ण आढला आहे.राज्यशासनाच्या मार्गदर्शनाखाली सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहे.कोनत्याही साथीच्या आजाराचा  प्रतिबंध करायचा म्हटल की स्वच्छता हिच एकमेव  उपाययोजना सद्या तरी अस्तित्वात आहे. सार्वजनीक स्वच्छतेची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांचे  कर्मचारी पार पाडत आहे.ग्रामिण भागाचा विचार करता ग्रामपालिका हि ऐकमेव संस्था आहे.जी सर्व नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेत असते. स्वच्छतेचे जे सेवक आहेत,ते आज आपण सर्वांसाठी जीवनदुत आहेत.हि बाब प्रत्येकाने लक्षात घ्या.ग्रामपंचायतचे  सर्व  कर्मचारी मागील एक महिन्यापासुन जीवाची पर्वा न करता कोरोना विषयी जनजागृती, दवंडी, प्रचार प्रसिद्धि, गावांमध्ये परदेशातुन व  मोठ्या शहरातून आलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करून वैद्यकीय विभागाला देणे,ज्यांच्या  हाताला काम नाही, ज्यांना रेशनकार्ड नाही अशा कुटुंबाचा शोध घेऊन त्यांच्या किमान एक वेळच्या जेवणाची सोय कशी करता येईल यासाठी प्रयत्न करणाऱ्या स्वयंसेवकांना भोजन पॅकेट तयार करण्यापासून ते वाटपापर्यंत मदत करणे.ग्रामसेवकांना व सरपंचाना प्रत्येक कामात मदत,अंखडित स्वच्छ पाणी पुरवठा व स्वच्छता( साफसफाई,घंटागाडी),दिवाबत्तीचे कामे करत आहेत.ते पण अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने आणि या राष्ट्रीय आपत्तीमध्ये  देशसेवा करण्याचे भाग्य अजमावत आहेत याचा सर्वांना अभिमान आहे.
आज आपण घरात बसुन फक्त आपल्या कुटुंबाचा विचार करतो.परंतु या लोकांना स्वताच्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला देखील पुरेसा वेळ नाहीय.साथीच्या आजारावर नियंत्रण मिळविणे हे राष्ट्रिय कर्तव्य मानुन हे लोक काम करत आहे.पीपीई किट,एन - 95 मास्क अादींची अपुरी सुरक्षा असताना हे सर्व लोक सामाजिक योगदान देत आहे.एप्रिल महिन्याचा सुर्य अक्षरशा आग ओकतोय इतके ऊन बाहेर आहे.तरी न थांबता  यांची सेवा अविरत सुरू आहे.रात्री उशिरा हे सेवक घरी पोहचतात तेव्हा घरातील सर्व सदस्य यांची आतुरतेने वाट पाहत बसलेले असतात.कित्येकदा अधिकार्यांचा फोन आला की जेवन अर्धवट सोडुन लगेच कार्यासाठी तत्पर हजर व्हावे लागते असा अनुभव आमच्या एका मित्राने सांगितला.तेव्हा मात्र नकळत डोळ्यात अश्रु तरळुन गेलेत.आम्ही इकडे वेगवेगळे नवनविन पदार्थ बनवुन खाण्यात मग्न असताना.हे सेवक मात्र दोनवेळचे भोजन वेळेवर करू शकत नाही.पोलीस प्रशासनास देखील या सेवकांची खुप मोलाची मदत होत आहे.खरे पाहिले तर अखंडित पाणी पुरवठा व स्वच्छता सेवेमुळेच ९०% लोक आज घरात बसून आहेत हे नाकारता येणार नाही. यामुळे कुणाला पाण्यासाठी भटकंती करावी लागली नाही.हे सगळं यांच्या मुळे होऊ शकले.यांना कोणाकडुन कसलीही अपेक्षा नाही. पण ज्या प्रमाणे डाँक्टर, पोलीस, नर्स,यांचे कौतुक होत आहे. त्याच प्रमाणे यांचेही कौतुक व्हावे हेच त्यांनाही अपेक्षित असेलच,त्यांचा तो हक्क आहे.आज सोशल मीडियावर सर्वांचे आभार कौतुक होत आहे पण माझा कर्मचारी शांत आपले काम इमानेइतबारे करत आहे. त्याला कसलीच अपेक्षा नाही फक्त सेवा करणे त्याचा पिंड आहे.आज गटारीमध्ये उतरून स्वच्छता असेल, मेलेली जनावरे उचलणे असेल, शौचालयाची टाकी साफ करण्यापर्यंतचे कामकाज करणारा आमचा ग्रामपंचायतीचा कर्मचारी आहे.हा कर्मचारी शासन दरबारी अत्यंत खितपत पडलेला आहे त्यामुळे त्याला ग्रामपंचयात स्थापनेपासून ते आजपर्यंत त्यांना मिळणारे वेतन 10 हजाराच्या पुढे नाही. अल्प वेतनात मुलांचे शिक्षण, कुटुंबाचे वैद्यकोय खर्च, प्रवास, सणवार, उत्सव, प्राथमिक गरज कशा भागवायच्या हे मला तरी वाटत याच कर्मचाऱ्यांकडून शिकले पाहिजे.शेवटी या कर्मचाऱ्यांचे नियोजन आणि सेवा बघता काही कुसुमाग्रजांच्या या काव्यपंक्ती आठवतात.
मोडून पडला संसार 
तरी मोडला नाही कणा.
पाठीवर हात ठेवून 
तुम्ही फक्त लढ म्हणा !!
गावाची सुरक्षा,स्वच्छ पाणी पुरवठा व स्वच्छता हेच यांचे ध्येय.आपतकालीन स्थितीत वरील सर्व काम सुरू असताना जन्म- मृत्यू नोंदणी ,आर्थिक वसुली करणे यासह इतर कार्यालयीन सेवा अविरत  सुरू आहे.शासनाने आता तरी यांच्या कार्याची दखल घेवुन यांना इतर शासकीय कर्मचार्यांप्रमाणे वेतन,मोफत आरोग्यसेवा,विमाकवच द्यावे हि यांचेवतीने विनंती.सर्व नागरीकांना तुमच्या या कार्याचा नक्कीच अभिमान  आहे.दिव्यत्वाची जिथे प्रचिती तिथे कर माझे जुळती.या सर्व स्वच्छता दुतांना,म्हनजेच जीवनदुतांना माझा तमाम नागरीकांच्या वतीने मानाचा मुजरा.सलाम.

लेखक - श्री.समीर देवडे
शिक्षक जिजामाता प्राथमिक  शाळा,लासलगाव ता.निफाड जि.नासिक

 


8) खाकी वर्दीतला देवदुत महाराष्ट्र पोलीस.

....
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय.हे आपल्या महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे ब्रीदवाक्य आहे.या वाक्यातुनच आपल्याला त्यांच्या कार्याची महती कळते.सदैव जनतेच्या रक्षणासाठी आम्ही कार्यरत आहोत हेच आमचे आद्य कर्तव्य आहे.महाराष्ट्र राज्याचे पोलीस दल हे राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था आहे.महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक आहे.मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय आहे.
सध्या जगभरात कोरोना कोवीड19 या व्हायरसचे थैमान सुरू आहे.यातुन आपला देश किंवा राज्य देखील सुटलेले नाही.मग जबाबदारी आली ती शासकीय यंत्रणा  व समाजाची देखील.शासनाच्या आरोग्य विभागाकडुन विविध  उपाययोजना, जनजागृती सुरू करन्यात आली.परंतु भारत देशातील रूग्ण संख्या वाढत असल्याने माननीय  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 22 मार्च रोजी घोषीत केलेल्या जनता कर्फुला देखील सबंध देशवासीयांनी प्रचंड प्रतिसाद दिला.कोरोना लढ्यामध्ये आपले कर्तव्य बजावणारे डॉक्टर, नर्सेस,पॅरामेडिकल कर्मचारी,पोलीस दल,सफाई कामगार या सर्व देवदुतांना अभिवादन करण्यासाठी आपण सर्वांनी 22 मार्चला सायंकाळी पाच वाजता टाळी , घंटानाद , थाळीनाद करून  अभिवादन व कृतज्ञता व्यक्त केली आहे.नंतर सरकारने पुन्हा दिनाकं 14 एप्रिल पर्यंत देशभरात लॉकडाऊन घोषीत केले.येथुन खरी पोलीस यंत्रणेची कसरत सुरू झाली.अपुरे मनुष्यबळ असताना देखील चोख बंदोबस्त ठेवत लॉकडाऊनची सक्त अंमलबजावणी सुरू केली.नागरीकांना घरात बसण्याचे आव्हान राज्य शासनाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे ,राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तमाम जनतेला वेळोवेळी मार्गदर्शन करून केले आहे.लॉकडाऊन व सोशल अंतर पाळण्याच्या सुचना दिल्या आहेत.तसेच पोलीसांना सहकार्य करन्याचे आव्हान  केले आहे.दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे.या परिस्थितीत सर्व राज्याची  परिस्थिती  पोलीस समर्थपणे सांभाळत आहे.शासन आदेशाप्रमाणे अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या.मग या सेवांशी निगडीत वाहतुक सुरू झाली.यात दुध,भाजीपाला,औषधे,इंधन इत्यादी वाहतुक करतांना रात्रंदिवस पोलीस डोळ्यात तेल टाकुन वाहनांची तपासणी करत त्यांना पुढे पाठवत आहे.अपुरे मनुष्यबळ पाहता अनेक ठिकाणी स्थानिक स्वयंसेवकांची मदत पोलीस प्रशासनाने  घेतली.याची सुरूवात आपल्या नासिक जिल्ह्यातुन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील साहेब यांनी केली. लॉकडाऊनमध्ये खाकी वर्दीतल्या या देवदुताचे रूप प्रकट व्हायला सुरूवात झाली.लॉकडाऊनमुळे दरोरोज रोजंदारी करनारे श्रमिक,बेघर असनारे लोक,निराधार स्त्री, पुरूष, अनेक  भिक्षेकरी अंध,अपंग यांना अन्न मिळेना.सर्व दुकाने,हॉटेल बंद या परिस्थित सर्वप्रथम या दिनदुबळ्यांचा मदतीला धावुन आला,तो आमचा चांदवड येथील पोलीस वर्ग , यांनी स्वखर्चीने या लोकांच्या दोनवेळच्या भोजनाची व्यवस्था सुरू केली.मग स्वाभाविकच समाजातील अनेक दानशुर या कार्यात जोडले गेले.आजही ही सेवा अविरत सुरू आहे.पन प्रथम पुढे  आला तो या खाकी वर्दीतला देवदुतच.नासिक येथे देखील याच पद्धतीचा उपक्रम पोलीस व सामाजिक संस्थाच्यावतीने सुरू आहे.मग सोशल मिडियातुन पोलीसांचे आभार व्यक्त करनारे,त्यांच्या या कार्याला सलाम देनारे संदेश व्हायरल होत आहेत.दुसरा प्रसंग लासलगाव येथील पोलिसांचा आहे. लासलगाव पोलीस ठाण्यातील गुप्तवार्ता विभाग प्रमुख कैलास महाजन व ए.एस.आय.राजेंद्र आहिरे
 हे लासलगाव स्टेशन रस्त्यावरील बँक ऑफ बडोदाजवळ कर्तव्य बजावत असतांना एक वृद्ध व्यक्ती कडाक्याच्या उन्हात झाडाखाली बसलेली दिसून आली.भुकेने व्याकूळ असलेल्या या वृद्ध व्यक्तीला या पोलीसांनी तात्काळ स्वताचे घरून पाणी आणि जेवण आनुन देत माणुसकीचे दर्शन घडविले. माणुसकीचे दर्शन घडविणारी ही घटना निश्चितपणे पोलीस खात्याची प्रतिमा वाढविणारी आहे. पोलिसांचे हे रुप बघुन लोकांनीही त्यांचे कौतुक करीत प्रशासनास  सहकार्य करण्याचे ठरविले आहे.अनेकजण बंदमध्ये सहकार्याच्या भूमिकेत आहेत.आमच्या लासलगावच्या कन्या सविता ठोंबरे या सद्या मुंबई येथे सहार आंतरराष्ट्रिय विमाणतळावर पोलीस निरिक्षक म्हनुन कार्यरत आहेत.त्या लासलगाव सारख्या ग्रामिण भागातील महाविद्यालयात शिक्षण घेवुन प्रथम प्रयत्नात स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत.महिला पोलीस अधिकारी असुनही त्यांनी सहकारी पोलीसांना सोबत घेत लॉकडाऊनमुळे त्यांच्या पोलीस स्टेशनच्या परिसरात फुटपाथवर राहणारे निराधार,मजुर वर्ग,रेल्वे व बस सेवा बंद असल्याने स्वताच्या गावी जावु शकत नसलेले बांधकाम मजुर या सर्वांची दोन वेळच्या जेवनाची व राहण्याची देखील सोय केली.स्वता महिला पोलीसांनी भोजन बनवण्याची जबाबदारी पार पाडली.नंतर काही सामिजिक संस्था मदतीसाठी पुढे आल्या. आजही हि सेवा पोलीसांच्या मदतीने सुरू आहे.जिथे सलग बारा,अठरा तास कर्तव्य बजावताना हे पोलीस स्वता उपाशी राहताय.स्वता पाण्यात बिस्किट बुडवुन खाताय.कदी दुसर्याने दिलेली मिरची भाकरी खाताना आपण मिडियातुन  पाहिलय.परंतु भुकेल्यांची दिनदयाळांची जेवनाची सोय ते करताय.तसेच अनेकांना त्यांनी स्वखर्चाने मास्क वाटप देखील केले आहे.स्वच्छतेचे संदेश देखील देत आहेत.नक्कीच हे आशिर्वाद भविष्यात यांच्या कुटुंबाला कामी येतील.इथे आपल्याला यांच्यारूपातील देवदुत दिसतात.
कोरोना या आजारावर ज्या रूग्णालयांमध्ये  उपचार केले जात आहेत.तेथे देखील अनेक पोलीस बंदोबस्त सेवा देत आहे.हि सेवा बजावताना वेळ प्रसंगी रूग्णवाहिकेतुन रूग्णाला खाली उतरविण्याची मदत देखील करत आहे.म्हनजे अनेकदा डॉक्टरांप्रमाणे पोलीस देखील या रूग्णांच्या संपर्कात येत आहे.कोरोना पॉजीटीव रूग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेन्याची जबाबदारी देखील पोलीसच पार पाडत आहे.अशा लोकांना शोधायच सरकारी रूग्णालयात पोहचवायचे.होम कॉरनटाईन केलेल्या लोकांवर , बरे होवुन घरी सोडलेले रूग्ण यांचेवर लक्ष ठेवायचे त्यांना बाहेर फिरू न देणे.अशा एक ना अनेक जबाबदार्या पोलीस रात्रंदिवस पार पाडत आहे.मग आता अशाप्रकारे स्वता रूग्णाच्या संपर्कात आलेले पोलीस जेव्हा सेवा संपली की घरी  जातात.तेव्हा त्यांची मानसिक अवस्था काय असनार.आपण जस घरातुन बाहेर पडायला घाबरतो.इथ मात्र उलट आहे.पोलीसांना स्वताच्या घरात यायची भिती वाटते.मनात असंख्य वादळ निर्माण होतात.आपल्यामुळे कुटुंबातील सदस्यांना काही व्हायला नको ही भिती सदैव त्यांच्या मनात आहे.स्वताच्या कुटुंबातील सदस्या पासुन दुर अंतरावर बसुन जेवन करतानाचा पोलीस दादांचा फोटो पाहिला की आपलही मन गहिवरून आल्या शिवाय राहत नाही.स्वताच्या लहान लेकरांना त्यांना जवळ घेत नाही.त्यांचे पासुन दुर झोपावे लागतेय.हे सर्व कोणासाठी सहन करताय ते.उत्तर आपल्या अंतरमनाला विचारून पहा.एक लहान बालक आपल्या पोलीस पित्याला बाहेर जावु नका बाहेर कोरोना आहे.असे आर्जव करून सांगत आहे.हा व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिला.त्या लहान बालकाला किती समजावण्याचा प्रयत्न तो पोलीस करत आहे.मी लगेच परत येतो.जास्त वेळ बाहेर थांबनार नाही अस त्या बालकाला सांगत जवळ घेवुन क्षणात दुर करत घराचे दार बंद करून सेवा बजावण्यासाठी बाहेर पडतोय.इथ मात्र आपणही गहिवरतो व डोळ्यातुन आपोआप आसव बाहेर पडतात.ते केवळ त्यांचे विषयी आपल्या मनात असलेली कृतज्ञता म्हनुन.मित्रांनो क्षणभर डोळे मिटा व स्वताला त्यांचे जागेवर उभ करून पहा, मग कळेल आपल्याला.
लॉकडाऊनमुळे आपण स्वता बाहेर पडु शकत नाही.परंतु अत्यावशक सेवे करिता बाहेर पडाव लागतेय.घरातील वृद्ध व्यक्ती किंवा इतर रूग्ण असतिल तर त्यांची औषधे आणन्या करिता प्रसंगी दुसर्या शहरा पर्यंत प्रवास करावा लागतोय इथे आपल्या मदतीला पोलीसच येत अाहेत.आज मुंबई सारख्या शहरातील लोकांना घरात बसुन दररोज अन्न खायला मिळतेय.दुध व भाजीपाला पोहोच होतोय.तो केवळ आपल्या शेतकरी बांधव व पोलीस यांच्या प्रयत्नामुळे.पोलीस बंदोबस्त पुरवताय म्हनुन शेतकरी दुध, भाजीपाला मोठ्या शहरांपर्यंत पोहचवु शकतोय.याची जाणीव शहरी लोकांनी ठेवण गरजेच आहे.या सर्व प्रवासात, बंदोबस्तात सेवा बजावताना पोलीसांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्यात सर्वात प्रथम पुढे आली ती लासलगाव येथील केमिस्ट असोशियशन.केमिस्ट लोकांनी एकत्र येत स्वखर्चाने लासलगाव येथे कार्यरत असनारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मास्क,सॅनिटायजर,हॅन्ड ग्लोव्ज,साबण,डेटॉल विविध कंपन्यांचे हात धुण्याचे द्रव साबणांचे पॅक वाटप केले.फक्त एकदाच वाटप करून केमिस्ट थांबलेले नाहीत.आजवर तिनदा त्यांनी वाटप केलय.यापुढे देखील कोरोनाची साथ जोवर अाहे तोवर पोलीसांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी केमिस्ट असोशियनचे नितीन नाहटा,संतोष डागा, जितेंद्र जांगडा, संदीप ठोंबरे, गणेश फड, नितीन डुंबरे यांचे इतर सर्वच सदस्यांनी घेतली आहे.पोलीसांप्रमाणेच लासलगाव ग्रामपंचायत कर्मचारी यांनी देखील वरीव वस्तुंचे वाटप करत आहे.हि झाली आरोग्याची काळजी.
बंदोबस्तासाठी पोलीस मुख्यालयातील अनेक पोलीसांना वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये पाठविण्यात आले आहे.यातले अनेकजण कुटुंबा पासुन दुरवर सेवा बजावत अाहे.मग त्यांच्या  भोजनाचा प्रश्न निर्माण झाला.इथेही लासलगावर मागे नाहीत.सामाजिक कार्यकर्ते महेश होळकर ज्यांना सबंध राज्य जलदाते म्हनुन ओळखतेय.यांनी आपल्या सहकारी मित्रांना सोबत घेत लासलगावमधील सावजी मिसळ यांचे हॉटेलमध्ये दररोज 250 लोकांच्या भोजण बनविण्याची व्यवस्था सुरू केली.या कार्यात सावजी कुटुंबाचे  देखील खुप मोठे योगदान आहे.पोलीसांना त्यांचे कर्तव्य बजावत असलेल्या जागेवर पॅक केलेले भोजन दररोज पोहचविले जात आहे.इतर निराधारांना देखील हे भोजन नित्यनेम सकाळ, सायंकाळ दिले जात आहे.कार्यकर्ते स्वता श्रमदान करून भोजन बनवित आहेत.
पोलीस देखील सदगत भावनेने या सेवकांचे आभार मानत आहे.की तुमच्यामुळे आम्हाला घरगुती भोजन मिळत आहे.कुटुंबापासुन दुर असलो तरी ती कमी भरुन निघाली.
पोलीस आपली जितकी काळजी घेत आहे.तितकीच काळजी समाजाने त्यांची घेणे गरजेचे आहे.हा आदर्श लासलगावने देशाला घडवुन दिला.याव्यतिरिक्त अनेक सामाजिक संस्था या कार्यात सहभागी आहेत.लासलगाव स्विमिंग ग्रुप देखील प्रत्येक आपतकालीन परिस्थितीत  पोलीसांच्या मदतीला सदैव तयार असतो.ग्रुपचे संस्थापक डॉ.अनिल बोराडे व दैनिक दिव्यमराठीचे पत्रकार निलेश देसाई हे सर्व सदस्यांना सोबत घेत पोलीसांना गणपती विसर्जन, पुरपरिस्थिती यावेळी मदत करतात.कुठतरी आपल्या मनातली पोलासांविषयी असनारी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा लहानसा प्रयत्न आहे.या लेखातुन पोलीसांच्या खाकी वर्दीतला देवदुत आपल्या समोर उभा करन्याचा हा माझा माणस सफल होवो.

श्री.समीर देवडे 
प्राथमिक शिक्षक लासलगाव
मोबा.7588556717



 

 7) मुलांच्या विकासासाठी कार्यरत असलेला उपक्रमशिल शिक्षक ..समीर देवडे.

 

लासलगाव - लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित,आय.एस.ओ.9001:2015 मानांकित जिजामाता प्राथमिक शाळा 100 टक्के सेमी इंग्रजी व डिजीटल क्लासरूमयुक्त एकमेव खाजगी प्राथमिक शाळा म्हणून नावारूपाला आली आहे.संस्थेचे संस्थापक लोकनेते कै.दत्ताजी भिकाजी पाटील यांनी स्थापन केलेली शाळा.त्यांचे ब्रीदवाक्य होते -  हाती घ्याल ते तडीस न्या! हेच आज संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.या वाक्याप्रमाणे संस्था व शाळेचा प्रवास पुढे सुरू आहे.या शाळेचे उपक्रमशिल उपशिक्षक समीर देवडे यांचा प्रेरणादाई शैक्षणिक प्रवास - सन 1997 मध्ये इंग्रजी माध्यमातुन डी.एड. ची पदवी प्राप्त करून त्याच वर्षी या शाळेत शैक्षणिक सेवेला सुरूवात केली.आपल्या इंग्रजी विषयाच्या ज्ञानाचा वापर शिक्षकांबरोबरच आपल्या शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना देन्यास सुरूवात केली.विविध कृतियुक्त इंग्रजी बडबड गीते असतिल किंवा इंग्रजी कविता सर्वच यांचे तोंडपाठ आहेत.त्यामुळे मुले देखील शिक्षकांचे अनुकरण करू लागले.जिजामाता शाळा तस म्हटल तर शहरी भागातली पन विद्यार्थी संख्या मात्र तळागाळातली व ग्रामिण भागातील जास्तच आहे. या विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचन व संभाषण करन्यात यशस्वी प्रयत्न केले. बदलत्या तंत्रज्ञानानुसार  इ - लर्निंगचा अध्यापनामधे वापर होणे गरजेचे आहे.संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या डिजीटल क्लासरूममुळे हे शक्य झाले.स्वता  दैनंदिन अध्यापनामध्ये विविध शैक्षणिक व्हिडिओ व डिजिटल अभ्यासक्रमाचा प्रभावीपणे वापर करत आहेत.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी लागुन मुले 100% उपस्थित राहु लागली आहेत.विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे विविध प्रयोग दाखविण्यासाठी संस्थेच्या विद्यालयातील  प्रयोगशाळेत घेवुन जातात.परिसर भेटीचे आयोजन करून विद्यार्थ्यांना परिसराचे ज्ञान मिळवून दिले जाते.हरित सेनेची स्थापना करत वृक्षलागवड करून वृक्ष संवर्धन केले आहे.त्याचे रूपांतर आज बहारदार वृक्षांत झाले आहे.दरवर्षी पालक मेळावा,माता पालक मेळावा, मा.विद्यार्थी मेळावा इत्यादींचे आयोजन केले जाते. कला, कार्यानुभव विषय,आकाश कंदिल, राखी निर्मित्ती अशा विविध कार्यशाळांचे आयोजन,कॅमलिन प्रस्तुत नवनित चित्रकला स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केली जाते.योगासने, सर्वांग सुंदर कवायत, मुक्तहालचाली व विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.मागील पाच वर्षापासुन ते स्पोकन इंग्लिश व ब्रिटिश कौन्सिलचे  राज्य मार्गदर्शक म्हणुन काम करत आहे.त्यांनी माय स्पोकन इंग्लिश बूक हे पुस्तक लिहले असून त्याच्या दोन आवृत्ती प्रकाशित झाल्या आहेत.त्यासाठी राज्याच्या शिक्षण मंत्र्यांचे अभिनंदन पत्र प्राप्त झाले आहे.शिक्षण विभाग व ब्रिटिश कौन्सिल मार्फत त्यांची दोन वेळा इंग्रजी विषयाच्या आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी निवड झाली अाहे.विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध डॉक्टरांची व्याख्याने,लेक वाचवा, लेक शिकवा अभियान ,परिसरातील विविध कवी व लेखक यांची भेट घडवुन आणली जाते.श्यामची आई कथामाला वर्गात राबविली जाते.संस्थेने आयोजीत केलेल्या क्रिडास्पर्धां,विज्ञान प्रदर्शन, मोफत आरोग्य तपासणी शिबिर,सांस्कृतिक कार्यक्रम, आनंद नगरी ,दप्तरमुक्त शनिवार इत्यादी उपक्रम राबविले जातात.ऑगष्ट 2019 मध्ये 
महाराट्र शासन व ब्रिटिश कौन्सिलच्या  तेजस प्रकल्पातील कथा परिवर्तनाच्या पुस्तकात  समीर देवडे यांची इंग्रजी विषयाची यशोगाथा प्रकाशीत करन्यात आलीय. उत्कृष्ट प्रशिक्षक म्हनुन त्यांचा गौरव करन्यात आलाय.गुगल प्ले स्टोअरमधून वर्ग अध्यापनात वेगवेगळ्या शैक्षणिक अ‍ॅप्सचा  वापर ते करतात.उदा.पेपर मर्ज  क्यूब अॅप,क्यु आर कोड स्कॅनर, हॅलो इंग्लिश,सी वर्डस,अॅनिमल फोरडी, ए.बी.सी गेम्स. स्वताच्या  ब्लॉगवर वर्गातील विविध  शैक्षणिक  उपक्रमांची माहिती ते लिहितात.
दैनंदिन अध्यापनात सोशल मिडियाचा सकारात्मक वापर केल्यास त्याचे प्रभावी परिणाम दिसुन येतात.एक वर्षापुर्वी स्वताचा यु-ट्युब चॅनल निर्माण करून.आज राज्य,देश नव्हे तर परदेशातील एक लाखाहुन अधिक शिक्षकांनी त्यांच्या चॅनलवरील विडिओ पाहिलेत. शाळेतील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी विषयाच्या कविता,कृतियुक्त गीते, भाषिक खेळ,संभाषणे, विविध उपक्रम   इत्यादींचे विडिओ  ते यु-ट्यूब वर अपलोड करतात.त्याचा फायदा राज्यातील शिक्षकांना दैनंदिन अध्यापनात होत असुन.सदरचा यु- ट्युब चॅनल नक्कीच राज्यातील शिक्षकांसाठी मार्गदर्शक आहे.
करील मनोरंजन जो मुलांचे ,जडेल नाते प्रभुशी तयाचे या साने गुरूजींच्या सुविचाराने प्रेरीत होवुन ग्रामिण भागातील  मुलांना आनंददायी शिक्षण देन्यासाठी त्यांची धडपड सुरू असते.संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी अभिनंदन पत्र देवुन कार्याचा गौरव केला आहे.तसेच आजवर विविध संस्थाचे राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.
at March 29, 2020
Email ThisBlogThis!Share to TwitterShare to FacebookShare to Pinterest

6) विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता.



स्वच्छता म्हनजेच  ईश्वरता आहे.आम्ही हा शब्द अनेक वेळा ऐकला आहे.पण आपण याचे  अनुकरण करतो का?स्वच्छता प्रत्येकाने पाळली पाहिजे.चला तर जाणुन घेवुृया स्वच्छते विषयी आनखी काही.
स्वच्छता म्हणजे आपल्या परिसरात घाण नाही,धूळ नाही, डाग नाहीत,दुर्गंधी नाही.स्वच्छतेचे उद्दीष्ट म्हणजे निरामय आरोग्य होय.प्रत्येकाने  घाण व दूषित पदार्थांचा प्रसार टाळणे गरजेचे अाहे.जे काही स्वच्छ आहे त्याची प्रशंसा केली पाहिजे.
स्वच्छतेच्या मदतीने आपण आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य स्वच्छ ठेवू शकतो, ज्यामुळे आपल्याला बरे वाटेल. स्वच्छता शरीर, मन आणि आत्मा स्वच्छ आणि शांत ठेवून चांगल्या चरणाला जन्म देते. स्वच्छता राखणे हे निरोगी जीवनाचा आवश्यक भाग आहे कारण केवळ स्वच्छताच बाह्य आणि अंतर्गत स्वच्छ राहून आपले व्यक्तिमत्त्व सुधारण्यास मदत करते.
ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि एखाद्याने स्वत: ला आणि त्यांच्या आसपासचे वातावरण स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवले पाहिजे. हे मनामध्ये चांगले आणि सकारात्मक विचार देखील आणते जे रोगांची घटना कमी करते.
आपल्या रोजच्या नित्यकर्मांमध्ये स्वच्छता आणि स्वच्छता महत्वाची भूमिका बजावते. हे डेंग्यू, टायफाइड, हिपॅटायटीस आणि डास चावल्यामुळे होणारे इतर आजार इत्यादी धोकादायक आजारांना प्रतिबंधित करते.
कावीळ, कोलेरा, एस्केरियासिस, लेप्टोस्पायरोसिस, रिंगवर्म, स्कॅबीज, स्किटोसोमायसिस, ट्राकोमा इत्यादी आजार दूषित अन्न खाण्यामुळे, दूषित पाणी पिण्यामुळे किंवा अस्वच्छ स्थितीत जगल्यामुळे पसरतात. कचरा देखील दुर्गंधी पसरवते जे सहन करणे कठीण आहे.स्वच्छतेच्या  उपाययोजना न केल्यास कचरा आणि घाण देखील जमा होईल.
स्वच्छतेच्या काही सवयी ज्यांचे पालन व अनुकरण आपण सर्वांनीच केले पाहिजे.
जेवन करन्यापुर्वी किंवा कोणतेही अन्न पदार्थ खाण्यापूर्वी नेहमीच हात स्वच्छ धुवावेत.
खेळल्यानंतर हात धुणे देखील अत्यंत आवश्यक आहे. दिवसातुन आपण कमीतकमी दोनदा दात घासणे गरजेचे आहे.
सार्वजनिक ठिकाणा कोणीही कचरा टाकू नये.प्रत्येकाने  दररोज आंघोळ करणे अनिवार्य आहे.
शिंका येताना आपले नाक झाकणे व खोकताना किंवा  जांभई देताना तोंड झाकणे देखील आवश्यक आहे.
जर एखाद्याच्या घरात कीड आणि उंदीर असतील तर त्यांनी शक्य तितक्या लवकर त्यांची सुटका केली पाहिजे.
शिजवलेले अन्न पदार्थ नेहमी झाकुन ठेवले पाहिजे.शारीरिक स्वच्छतेत शरीर, कपडे, अन्न, घरे आणि बाह्य वातावरणातील घाण आणि अशुद्धतेचे उच्चाटन होते. शरीराची स्वच्छता साबणाने आणि पाण्याने संपूर्ण शरीराच्या आंघोळीद्वारे केली जाते, हात धुण्याची सराव आणि घाणीपासून दूर ठेवते. कपडे स्वच्छ करणे ही एक कपडे धुण्याची प्रक्रिया आहे ज्याद्वारे हाताने हाताने धुणे किंवा मशीन धुणे शक्य आहे. वातावरण स्वच्छ करणे म्हणजे वातावरणातील घाण गोळा करणे आणि योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्याद्वारे, वातावरणाच्या तिन्ही बाबी म्हणजेच, हवा, पाणी आणि जमीन यांची शुद्धता पाळणे. अन्नाची हाताळणी करताना, हात धुण्याद्वारे आणि स्वच्छ पाककला आणि भांडी खाऊन स्वच्छता पाळली पाहिजे जेणेकरून घाणीचा त्रास टाळता येईल. घरे आणि घरातील वस्तू देखील स्वच्छ ठेवल्या पाहिजेत विशेषत: राहण्याची जागा, स्वयंपाकघर, शयनगृह आणि स्नानगृहे कारण आपण घरातील वातावरणाशी बर्‍याचदा संवाद साधतो
स्वच्छतेचे महत्त्व:
स्वच्छता हा  मानवी जीवनाचा एक महत्वाचा घटक आहे.मानवतेच्या कल्याण आणि अस्तित्वामध्ये शारीरिक स्वच्छता महत्त्वपूर्ण आहे.स्वच्छता ही व्यक्ती आणि समाजातील आरोग्यासाठी  आवश्यक आहे.आरोग्य आणि स्वच्छता एकमेकांशी संबंधित असतात आणि एकमेकांवर प्रभाव पाडतात. तब्येत चांगली राहण्यासाठी स्वच्छतेचा सराव केला पाहिजे.स्वच्छता ही मुळात चांगले आरोग्य राखण्याची आणि स्वच्छतेद्वारे रोग रोखण्याची प्रथा आहे.शरीराची स्वच्छता, अन्न आणि वातावरणाची स्वतंत्र आरोग्यासाठी निरोगीपणा आहे. स्वच्छतेमुळे रोगापासून बचाव होतो कारण घाण सहसा संसर्गजन्य रोगजनकांना रोखुन  ठेवते ज्यामुळे जेव्हा ते मनुष्यासमोर येतात तेव्हा त्यांना रोगाचा प्रादुर्भाव होतो.आरोग्य व्यावसायिकांकडून आरोग्यविषयक पद्धतींचा जास्त सल्ला दिला जातो कारण रोगाचा प्रतिकार करणे आणि उपचार घेण्यापेक्षा रोग रोखणे चांगले. आरोग्यदायी प्रथा अंगिकारनार्या व्यक्ती दिर्घआयुष्य  जगतात कारण ते आजारांपासून मुक्त असतात.
शेवटी, व्यक्तींच्या जीवनात स्वच्छता अटळ आहे. कार्यक्षमता आणि विकास टिकवून ठेवण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याभोवती असलेली प्रत्येक गोष्ट स्वच्छतेसाठी व्यवहार्य आहे.  मानवी सुसंवाद आणि आरोग्यासह,सुरक्षा आणि आयुष्याच्या बाबतीत पर्यावरणाशी संबंधित शारीरिक स्वच्छता फायदेशीर आहे.





5) मराठी राजभाषा दिन.

दि.27 फेब्रुवारी हा दिवस सबंध जगभरात मराठी भाषिक मराठी दिन म्हनुन साजरा करतात.या दिवसालाच अन्य नावे :मराठी भाषा दिवस,मराठी राजभाषा दिन ,मराठी गौरव दिन असे संबोधले जाते.ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो.भारतीय ज्ञानपिठ न्यासाकडुन १९८७ साली त्यांना मराठी वाडमयातील योगदाना बद्दल ज्ञानपीठ पुरस्कार बहाल केला.ज्ञानपीठ पुरस्कार भारतीय ज्ञानपीठ न्यासाद्वारे भारतीय साहित्यासाठी दिलेला सर्वोच्च पुरस्कार आहे.या पुरस्कारमध्ये रोख रक्कम,प्रशस्तिपत्र आणि वाग्देवीची  कांस्य प्रतिमा भेट दिली जाते.भारतातुन मराठी साहित्याला पहिला ज्ञानपिठ पुरस्कार इ.स.1974 मध्ये लेखक विष्णु सखाराम खांडेकर यांना ययाती या कांदबरीसाठी देन्यात आला.त्यांनतर कवीवर्य विष्णु वामन शिरवाडकर  (कुसुमाग्रज) यांना नटसम्राट या नाट्यासाठी देन्यात आला.नंतर इ.स.2003 मध्ये विं.दा.करंदिकर यांना देन्यात आला.अलिकडे इ.स.2014 मध्ये लेखक भालचंद्र वनाजी नेमाडे यांना हा पुरस्कार देन्यात आला.त्यानंतर शासनाने कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा दिवस मराठी  गौरव दिन म्हणून जाहीर केला.
वि.वा.शिरवाडकर यांना लहानपणापासून लिहण्याची आवड होती.त्यांनी बालपनी कविता लिहण्यास सुरूवात केली.पुढे कथा,कादंबरी,नाटक, ललित वाड्यमयातील नावाजलेलेली साहित्य रचना त्यांच्या लिखानातून अवतरत राहिली.त्यांच्या अनोख्या साहित्यासाठी १९७४ साली नटसम्राट या नाटकासाठी ‘साहित्य अकादमीचा पुरस्कार’ मिळाला.भारत सरकारने १९९१ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरविन्यात आले आहे.असे अनेकविध पुरस्कार त्यांच्या साहित्याला प्राप्त झाले आहे.त्यांचे स्मारक आपल्या नासिकमध्ये आहे.वाडमयाचा प्रचार व प्रसार वेगवेगळ्या माध्यमातुन व्हावा या उदात्त हेतुने त्यांनी आपले लिखान केले आहे.त्यात नाट्यलेखन,कविता,गीते,कांदबरी,कथा यांचा समावेश आहे.
मराठी भाषा संवर्धनासाठी अनेकविध उपयायोजना शासनाकडुन राबविल्या जातात.परंतु मराठी भाषिक,मराठी माध्यमाच्या शाळेतील शिक्षक या नात्याने भारत देशात मराठी विषय व मराठी माध्यमांच्या शाळेत  शिकविन्याचे,ज्ञानदानाचे कार्य करनार्या प्रत्येक शिक्षकाचे हे आद्य कर्तव्य आहे.आपण मराठी भाषा संवर्धनासाठी तन,मन,धनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.यासाठी अनेक विविध उपक्रम आपण प्राथमिक ते महाविद्यालयीन  स्तरावर राबवु शकतो.उदा.दैनंदिन पाठ्यक्रमा व्यतिरिक्त  विविध प्रकारचे मराठी नाटके मुलांकडुन करून घेणे.वेगवेगळ्या नाट्य स्पर्धांमद्ये शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे.शालेय स्तरावर अथवा तालुका,जिल्हा स्तरावर  अशा स्पर्धांचे आयोजन करणे.उदा.जिल्हा विज्ञान अध्यापक संघाच्यावतीने दरवर्षी विज्ञान नाट्य स्पर्धा आयोजीत केल्या जातात.यात प्रत्येक  शाळेने सहभागी होने गरजेचे आहे.विविध शैक्षणिक, धार्मिक  चित्रपट मुलांना दाखविणे.शास्त्रीय संगीत ऐकविणे,तशा प्रकारच्या संधी मुलांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.शाळा स्तरावर विद्यार्थी - शिक्षक काव्य संमेलन आयोजीत करण.औरंगाबाद येथुन दरमहा प्रकाशित होणारे शासनमान्य जीवन गौरव मासिक दरवर्षी अशाप्रकारचे राज्यस्तरीय साहित्य संमेलन व काव्य संमेलन आयोजीत करत आहे.संपादक रामदास वाघमारे सर,सह संपादक शिक्षिका वैशाली भामरे, रूपाली कराड यांचे यात फार मोठे योगदान आहे.या मासिकात शिक्षक विद्यार्थ्यांच्या मराठीतील कविता, लेख  प्रकाशित केले जातात.अशा प्रकारच्या अनेक संस्था कार्यरत आहे.त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवुन देणे शिक्षकांचे कर्तव्य आहे.निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा आणि मराठी भाषेला उत्तम दिशा देण्याचे अनेकविध  कार्यक्रम आपण आयोजित करू शकतो.लासलगावचा मराठी भाषा संवर्धन व विकासाचा थोडक्यात आढावा घेणे यानिमित्ताने औचित्याचे ठरेल.वनस्थळी (कलांजली) संस्था शास्त्री नगर, लासलगाव यांचे तर्फे दरवर्षी राजभाषा दिनाच्या औचित्याने कवी संमेलन आयोजीत करन्यात येते.यावर्षी देखील जेष्ठ साहितीक मराठीचे प्राध्यापक  शिरीष गंधे यांचे अध्यक्षतेखाली काव्य संमेलन संपन्न होत आहे.ज्यात अनेक शिक्षक व विद्यार्थी आपल्या कविता सादर करनार आहे.अशा प्रकारचे उपक्रम आपण शाळा स्तरावर देखील राबवु शकतो.लासलगाव मराठी साहित्य परिषद नेहमी नवोदित लेखक व कवी यांना मार्गदर्शन करून नविन लिखानासाठी शुभेच्छा देत असते.लासलगाव येथील रहिवाशी महाराष्ट्रातील  ख्यातन्याम कवी,गीतकार प्रकाश होळकर यांचे मराठी साहित्य  क्षेत्रात मोठे योगदान आहे.अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे.त्यांचे अनेक कवीता संग्रह प्रकाशित झाले आहेत.दुरदर्शनवर देखील अनेक कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. इतिहास अभ्यासक संजय बिरार यांचे लेखन अतिशय उत्कृष्ट आहे. त्यांचे नविन पुस्तक लासलगावची बखर प्रकाशनाच्या वाटेवर आहे.अनेक लेख व परमपूज्य भगरी बाबांवर त्यांनी माहिती संकलित केली आहे. तसेच प्रा.किशोर गोसावी यांनी देखील लासलगावचे आराध्यदैवत परमपूज्य भगरी बाबा दिव्यदर्शन या पुस्तकाचे लेखन केलेल आहे. 
नवोदित लेखक शिवाजी विसपुते यांच्या विधिलिखीत या कादंबरीने देखील अनेक पुरस्कार मिळविले आहेत. नुकताच त्यांच्या या कादंबरीला समृद्धी प्रकाशन संस्था हिंगोलीच्या वतीने दिला जाणारा 'राज्यस्तरीय संत नामदेव कादंबरी साहित्य पुरस्कार 2019' मिळाला आहे.झी युवा सिंगर एक नंबर फेम गायक विंचुर येथील  जगदिश चव्हाण हा लासलगाव शिक्षण सहायक मंडळ संचलित लोकनेते दत्ताजी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी आहे.संगीत व गीत गायनात सुवर्णा क्षिरसागर यांनी अनेक विद्यार्थी घडविले आहेत.नुकताच त्यांचा डिडी सह्याद्री या शासकीय वाहिनीवर संगिताचा कार्यक्रम प्रसारित झाला आहे.मराठी संगीत क्षेत्रात ग्रामिण भागात त्यांचे मोठे योगदान आहे.संगितकार बाबासाहेब चव्हाणके यांचे विद्यार्थी देखील मराठी गीतगायनात राष्ट्रिय स्तरावर चमकले आहेत.महेंद्र फुलपगार, तुषार देवरे असे अनेक नामवंत कलाकार ग्रामिण शहरी भागात मराठी भाषा,मराठी संगीत,गीतगायन यात आपले योगदान देत आहे.ते नक्कीच प्रेरणादाई आहे.अरुण भांबारे यांचे इतिहासा वरील लेख वाचनीय व माहितीपुर्न असतात.त्यांची लेखन शैली अतिशय प्रभावी आहे.कवी राजेंद्र  होळकर यांचे देखील साहित्य क्षेत्रात व मराठी भाषा संवर्धनासाठी खुप मोठे योगदान आहे.लासलगाव समाचार या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातुन ते नवोदित लेखक, कवी यांचे लेख व कविता यांना नेहमीच प्रसिद्धी देत असतात.शेतीतज्ञ सचिन होळकर यांचे शेतीविषयक मार्गदर्शनपर लेख अनेक वृत्तपत्रे व मासिके यात प्रकाशित झाले आहे.पत्रकार रामभाऊ आवारे,समीर पठाण,निलेश देसाई व अन्य सर्वच पत्रकार यांचे अनेक विषाावरील नाविन्यपुर्न लेख प्रकाशित झालेले आहेत.  ऋषीकेश जोशी गुरू यांचे आपले सण आपले उत्सव व इतिहासपर लेख माहितीपुर्न व मार्गदर्शन करनारे असतात.ब्राम्हण समाजाच्या राज्य कार्याध्यक्षा स्मिता कुलकर्णी यांचे स्त्री सक्षमीकरणावरील लेख मार्गदर्शक असतात.कवी शिक्षक कैलास भामरे,नुमान शेख,गुरुदेव गांगुर्डे यांच्या कविता महाराष्ट्र राज्य साहित्य संमेलनात सादर झालेल्या आहेत.त्यांचे मार्गदर्शनाने अनेक विद्यार्थी कविता लेखन करत आहे.अशा प्रकारे लासलगाव परिसरातील विविध व्यक्तींचे मराठी भाषा संवर्धनासाठी अतोनात प्रयत्न सुरू आहेत.मराठी राजभाषा दिनाच्या आपण सर्व वाचकांना हार्दिक  शुभेच्छा.लेखन व वाचन संस्कृती जोपासण्यासाठी कटिबद्घ राहुया.
समीर देवडे 
उपशिक्षक जिजामाता प्राथमिक शाळा,लासलगाव
at February 24, 2020

4) मुलांच्या सर्वांगिन विकासाठी दप्तरमुक्त अभियान राबविनारी शाळा.



लासलगाव - लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित,आय.एस.ओ.9001:2015 मानांकित जिजामाता प्राथमिक शाळा 100 टक्के सेमी इंग्रजी व डिजीटल क्लासरूमयुक्त एकमेव खाजगी प्राथमिक शाळा म्हणून नावारूपाला आली आहे.संस्थेचे संस्थापक लोकनेते कै.दत्ताजी भिकाजी पाटील यांनी स्थापन केलेली शाळा.त्यांचे ब्रीदवाक्य होते -  हाती घ्याल ते तडीस न्या! हेच आज संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.या वाक्याप्रमाणे संस्था व शाळेचा प्रवास पुढे सुरू आहे.या शाळेत परिसरातील गरीब, कष्टकरी वर्गाचे, सर्वसामान्य पालकांचे 600 पेक्षा अधिक मुले शिक्षण घेतात.जे पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आर्थिक परिस्थितीमुळे प्रवेश घेवु  शकत नाही.अशा विद्यार्थ्यांसाठी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील,सचिव संजय पाटील यांनी  शाळा 100% सेमी इंग्रजी केली.सर्वच विद्यार्थ्यांना याचा फायदा होत आहे.इंग्रजी माध्यमाच्या शाळेतुन दरवर्षी अनेक मुले या शाळेत प्रवेश घेत आहेत.ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र,आर.टी.ई.कायदा यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होणे अपेक्षित आहे.तसेच विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करणे गरजेचे व कायद्याने बंधनकारक आहे.यासाठी प.स.सदस्य रंजनाताई पाटिल, संचालिका निताताई पाटील ,शंतनु पाटील शाळेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील, मुख्याध्यापक अनिस काझी यांनी प्रभावी अंमलबजावनी करत दोन वर्षापुर्वी राज्यात पथदर्शी ठरलेला उपक्रम म्हनजे 'दप्तरमुक्त शनिवार' हा उपक्रम सुरु केला.2020 हे या उपक्रमाचे सलग दुसरे वर्ष आहे.सेमी इंग्रजी सोबतच इंग्रजी विषयात विद्यार्थ्यांची रूची वाढावी म्हनुन अभ्यासक्रमा व्यतिरिक्त विविध कृतियुक्त इंग्रजी बडबड गीते म्हनुन घेतली जातात. सर्व मुलांच्या  इंग्रजी कविता  तोंडपाठ आहेत.शिक्षक स्वता अध्यापनात कृतीचा पुरेपुर वापर करतात.त्यामुळे मुले देखील शिक्षकांचे अनुकरण करतात.तसेच इंग्रजी वाचन व संभाषण प्रभावीपणे करता यावे यासाठी यशस्वी प्रयत्न केले जातात.शाळेचे उपशिक्षक समीर देवडे यांनी लिहिलेल्या माय स्पोकन इंग्लिश बुक या पुस्तकाचा देखील विद्यार्थी व शिक्षकांना दैनंदिन अध्यापनात उपयोग होत आहे.बदलत्या तंत्रज्ञानानुसार  इ - लर्निंगचा अध्यापनामधे वापर होणे गरजेचे आहे.संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या डिजीटल क्लासरूममुळे हे शक्य झाले.सर्वच शिक्षक दैनंदिन  अध्यापनामध्ये विविध शैक्षणिक व्हिडिओ व डिजिटल अभ्यासक्रमाचा प्रभावीपणे वापर करत आहेत.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी लागुन मुले 100% उपस्थित राहु लागली आहेत.पारंपारिक अध्यापनाबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अध्यापनात करतांना शनिवारी विविध कार्यशाळा आयोजीत करुन विद्यार्थ्यांना गुगल प्ले स्टोअरमधून विविध शैक्षणिक अ‍ॅप्सचा  वापर प्रात्याक्षिकासह दाखविन्यात येतो. उदा.पेपर मर्ज  क्यूब अॅप,क्यु आर कोड स्कॅनर, हॅलो इंग्लिश,ए.बी.सी. वर्डस,अॅनिमल फोरडी, ए.बी.सी गेम्स,युटबवरील विविध व्हिडिओ प्रोजेक्टरवर पाहणे.याद्वारे दैनंदिन अध्यापनात सोशल मिडियाचा सकारात्मक वापर केल्याने त्याचे प्रभावी परिणाम दिसुन आलेत.शाळेने एक  वर्षापुर्वी स्वताचा यु-ट्युब चॅनल निर्माण केलेला आहे..आज राज्य,देश नव्हे तर परदेशातील एक लाखाहुन अधिक शिक्षकांनी शाळेच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहिलेत. शाळेतील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी विषयाच्या कविता,कृतियुक्त गीते, भाषिक खेळ,संभाषणे, विविध उपक्रम   इत्यादींचे विडिओ  ते यु-ट्यूब वर अपलोड करतात.त्याचा फायदा राज्यातील शिक्षकांना दैनंदिन अध्यापनात होत असुन.सदरचा यु- ट्युब चॅनल नक्कीच राज्यातील शिक्षकांसाठी मार्गदर्शक आहे.सोशल मिडियाचा प्रभावी वापर करत शिक्षक शाळेत राबविलेले उपक्रम प्रसारित करतात.शाळेने प्रत्येक इयत्तेच्या पालकांसाठी महिला व पुरूष असे स्वतंत्र वाटसअप ग्रुप केलेले आहेत.त्याद्वारे सुचना, शाळेत राबिविलेले विविध उपक्रम पालकांपर्यंत पोहचविले जातात.
विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे विविध प्रयोग दाखविण्यासाठी संस्थेच्या विद्यालयातील  प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र असलेल्या प्रयोगशाळेत नेवुन तज्ञ शिक्षकांच्या मदतीने प्रयोग करून दाखविले जातात.यामध्ये विविध परिसर भेटीचे आयोजन करून विद्यार्थ्यांना परिसरातील पिके,नदी,बंधारे, ऐत्याहासिक वास्तु,सर्व धार्मिक प्रार्थनास्थळे यांची माहिती व ज्ञान मिळवून दिले जाते.हरित सेनेची स्थापना करत वृक्षलागवड करून वृक्ष संवर्धन केले आहे.शाळेतील विद्यार्थी सुटीनंतर घरी जाताना रोज बाटलीतील शिल्लक पानी झाडांना टाकतात.त्याद्वारे पान्याचा सद्उपयोग व वृक्षसंवर्धन केले जाते.दरवर्षी पालक मेळावा,माता पालक मेळावा, मा.विद्यार्थी मेळावा इत्यादींचे आयोजन केले जाते. कला, कार्यानुभव विषय,आकाश कंदिल, राखी निर्मित्ती अशा विविध कार्यशाळांचे आयोजन केले जाते.शाळेने नुकतेच युनिस्को क्लबचे सदस्यत्व प्राप्त केले आहे.त्याद्वारे आयोजीत एशियन पिंकी फेस्टा आंतराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे.इयत्ता चौथीची विद्यार्थीनी शिफा समीर पठाण हिच्या चित्राची निवड राष्ट्रीय स्तरावर झाली आहे.कॅमलिन प्रस्तुत नवनित चित्रकला स्पर्धा देखील शाळेत यशस्वीपणे आयोजित केली जाते.दप्तरमुक्त शनिवार उपक्रमा अंतर्गत योगाचार्य यांच्या मार्गदर्शनाने योगासने, सर्वांग सुंदर कवायत, मुक्तहालचाली घेतल्या जातात. तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध डॉक्टरांची व्याख्याने,वैघकिय तपासणी,दंत व नेत्र तपासणी शिबिरे आयोजीत केली जातात.तंबाखुमुक्त शाळा अभियानात तंबाखुमुक्त शाळेचा मान मिळालेला आहे.पालकांना देखील तंबाखुमुक्त करन्यात शाळेचा सिंहाचा वाटा आहे.लेक वाचवा, लेक शिकवा अभियान ,परिसरातील नामवंत विविध कवी व लेखक,गायक,कलावंत,पोलीस,पत्रकार , डॉक्टर  अशा विविध व्यावसायिक यांची भेट घडवुन आणली जाते.त्यांच्या कार्याचे प्रात्याक्षिक दाखविले जाते.सैनिक व पोलीसांसाठी रक्षाबंधन उपक्रम दरवर्षी राबविला जातो.श्यामची आई कथामाला  राबविली जाते. विविध शैक्षणिक चित्रपट मोठ्या चित्रपटगृहात संस्थेच्या मदतीने मोफत दाखविले जातात.विविध थोरपुरूषांच्या जयंती, निमित्ताने वकृत्व स्पर्धा आयोजीत करुन विद्यार्थ्यांना रोख पारितोषीक व शैक्षणिक साहित्य बक्षिस  दिले जातात. संस्था अंतर्गत आयोजीत केलेल्या क्रिडास्पर्धां,विज्ञान प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, आनंद नगरी  यात शाळेचा सक्रिय सहभाग असतो. संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील व संचालक मंडळ वेळोवेळी शाळेला भेटी देऊन अडीअडचणी समजून घेतात मुख्याध्यापक व शिक्षकांना मार्गदर्शन करतात. शाळेला नासिक विभागाचे  शिक्षण उपसंचालक , जिल्हा शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, या मान्यवरांनी भेटी देऊन शालेय उपक्रमांचे कौतुक केले आहे. लासलगाव बिटाचे विस्तार अधिकारी वसंत गायकवाड व पालकवर्ग यांचेही मार्गदर्शन मिळत असते.
मुलांच्या सर्वांगिन विकासाठी दप्तरमुक्त अभियान राबविनारी शाळा.
लासलगाव - लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित,आय.एस.ओ.9001:2015 मानांकित जिजामाता प्राथमिक शाळा 100 टक्के सेमी इंग्रजी व डिजीटल क्लासरूमयुक्त एकमेव खाजगी प्राथमिक शाळा म्हणून नावारूपाला आली आहे.संस्थेचे संस्थापक लोकनेते कै.दत्ताजी भिकाजी पाटील यांनी स्थापन केलेली शाळा.त्यांचे ब्रीदवाक्य होते -  हाती घ्याल ते तडीस न्या! हेच आज संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.या वाक्याप्रमाणे संस्था व शाळेचा प्रवास पुढे सुरू आहे.या शाळेत परिसरातील गरीब, कष्टकरी वर्गाचे, सर्वसामान्य पालकांचे 600 पेक्षा अधिक मुले शिक्षण घेतात.जे पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आर्थिक परिस्थितीमुळे प्रवेश घेवु  शकत नाही.अशा विद्यार्थ्यांसाठी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील,सचिव संजय पाटील यांनी  शाळा 100% सेमी इंग्रजी केली.सर्वच विद्यार्थ्यांना याचा फायदा होत आहे.इंग्रजी माध्यमाच्या शाळेतुन दरवर्षी अनेक मुले या शाळेत प्रवेश घेत आहेत.ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र,आर.टी.ई.कायदा यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होणे अपेक्षित आहे.तसेच विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करणे गरजेचे व कायद्याने बंधनकारक आहे.यासाठी प.स.सदस्य रंजनाताई पाटिल, संचालिका निताताई पाटील ,शंतनु पाटील शाळेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील, मुख्याध्यापक अनिस काझी यांनी प्रभावी अंमलबजावनी करत दोन वर्षापुर्वी राज्यात पथदर्शी ठरलेला उपक्रम म्हनजे 'दप्तरमुक्त शनिवार' हा उपक्रम सुरु केला.2020 हे या उपक्रमाचे सलग दुसरे वर्ष आहे.सेमी इंग्रजी सोबतच इंग्रजी विषयात विद्यार्थ्यांची रूची वाढावी म्हनुन अभ्यासक्रमा व्यतिरिक्त विविध कृतियुक्त इंग्रजी बडबड गीते म्हनुन घेतली जातात. सर्व मुलांच्या  इंग्रजी कविता  तोंडपाठ आहेत.शिक्षक स्वता अध्यापनात कृतीचा पुरेपुर वापर करतात.त्यामुळे मुले देखील शिक्षकांचे अनुकरण करतात.तसेच इंग्रजी वाचन व संभाषण प्रभावीपणे करता यावे यासाठी यशस्वी प्रयत्न केले जातात.शाळेचे उपशिक्षक समीर देवडे यांनी लिहिलेल्या माय स्पोकन इंग्लिश बुक या पुस्तकाचा देखील विद्यार्थी व शिक्षकांना दैनंदिन अध्यापनात उपयोग होत आहे.बदलत्या तंत्रज्ञानानुसार  इ - लर्निंगचा अध्यापनामधे वापर होणे गरजेचे आहे.संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या डिजीटल क्लासरूममुळे हे शक्य झाले.सर्वच शिक्षक दैनंदिन  अध्यापनामध्ये विविध शैक्षणिक व्हिडिओ व डिजिटल अभ्यासक्रमाचा प्रभावीपणे वापर करत आहेत.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी लागुन मुले 100% उपस्थित राहु लागली आहेत.पारंपारिक अध्यापनाबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अध्यापनात करतांना शनिवारी विविध कार्यशाळा आयोजीत करुन विद्यार्थ्यांना गुगल प्ले स्टोअरमधून विविध शैक्षणिक अ‍ॅप्सचा  वापर प्रात्याक्षिकासह दाखविन्यात येतो. उदा.पेपर मर्ज  क्यूब अॅप,क्यु आर कोड स्कॅनर, हॅलो इंग्लिश,ए.बी.सी. वर्डस,अॅनिमल फोरडी, ए.बी.सी गेम्स,युटबवरील विविध व्हिडिओ प्रोजेक्टरवर पाहणे.याद्वारे दैनंदिन अध्यापनात सोशल मिडियाचा सकारात्मक वापर केल्याने त्याचे प्रभावी परिणाम दिसुन आलेत.शाळेने एक  वर्षापुर्वी स्वताचा यु-ट्युब चॅनल निर्माण केलेला आहे..आज राज्य,देश नव्हे तर परदेशातील एक लाखाहुन अधिक शिक्षकांनी शाळेच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहिलेत. शाळेतील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी विषयाच्या कविता,कृतियुक्त गीते, भाषिक खेळ,संभाषणे, विविध उपक्रम   इत्यादींचे विडिओ  ते यु-ट्यूब वर अपलोड करतात.त्याचा फायदा राज्यातील शिक्षकांना दैनंदिन अध्यापनात होत असुन.सदरचा यु- ट्युब चॅनल नक्कीच राज्यातील शिक्षकांसाठी मार्गदर्शक आहे.सोशल मिडियाचा प्रभावी वापर करत शिक्षक शाळेत राबविलेले उपक्रम प्रसारित करतात.शाळेने प्रत्येक इयत्तेच्या पालकांसाठी महिला व पुरूष असे स्वतंत्र वाटसअप ग्रुप केलेले आहेत.त्याद्वारे सुचना, शाळेत राबिविलेले विविध उपक्रम पालकांपर्यंत पोहचविले जातात.
विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे विविध प्रयोग दाखविण्यासाठी संस्थेच्या विद्यालयातील  प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र असलेल्या प्रयोगशाळेत नेवुन तज्ञ शिक्षकांच्या मदतीने प्रयोग करून दाखविले जातात.यामध्ये विविध परिसर भेटीचे आयोजन करून विद्यार्थ्यांना परिसरातील पिके,नदी,बंधारे, ऐत्याहासिक वास्तु,सर्व धार्मिक प्रार्थनास्थळे यांची माहिती व ज्ञान मिळवून दिले जाते.हरित सेनेची स्थापना करत वृक्षलागवड करून वृक्ष संवर्धन केले आहे.शाळेतील विद्यार्थी सुटीनंतर घरी जाताना रोज बाटलीतील शिल्लक पानी झाडांना टाकतात.त्याद्वारे पान्याचा सद्उपयोग व वृक्षसंवर्धन केले जाते.दरवर्षी पालक मेळावा,माता पालक मेळावा, मा.विद्यार्थी मेळावा इत्यादींचे आयोजन केले जाते. कला, कार्यानुभव विषय,आकाश कंदिल, राखी निर्मित्ती अशा विविध कार्यशाळांचे आयोजन केले जाते.शाळेने नुकतेच युनिस्को क्लबचे सदस्यत्व प्राप्त केले आहे.त्याद्वारे आयोजीत एशियन पिंकी फेस्टा आंतराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे.इयत्ता चौथीची विद्यार्थीनी शिफा समीर पठाण हिच्या चित्राची निवड राष्ट्रीय स्तरावर झाली आहे.कॅमलिन प्रस्तुत नवनित चित्रकला स्पर्धा देखील शाळेत यशस्वीपणे आयोजित केली जाते.दप्तरमुक्त शनिवार उपक्रमा अंतर्गत योगाचार्य यांच्या मार्गदर्शनाने योगासने, सर्वांग सुंदर कवायत, मुक्तहालचाली घेतल्या जातात. तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध डॉक्टरांची व्याख्याने,वैघकिय तपासणी,दंत व नेत्र तपासणी शिबिरे आयोजीत केली जातात.तंबाखुमुक्त शाळा अभियानात तंबाखुमुक्त शाळेचा मान मिळालेला आहे.पालकांना देखील तंबाखुमुक्त करन्यात शाळेचा सिंहाचा वाटा आहे.लेक वाचवा, लेक शिकवा अभियान ,परिसरातील नामवंत विविध कवी व लेखक,गायक,कलावंत,पोलीस,पत्रकार , डॉक्टर  अशा विविध व्यावसायिक यांची भेट घडवुन आणली जाते.त्यांच्या कार्याचे प्रात्याक्षिक दाखविले जाते.सैनिक व पोलीसांसाठी रक्षाबंधन उपक्रम दरवर्षी राबविला जातो.श्यामची आई कथामाला  राबविली जाते. विविध शैक्षणिक चित्रपट मोठ्या चित्रपटगृहात संस्थेच्या मदतीने मोफत दाखविले जातात.विविध थोरपुरूषांच्या जयंती, निमित्ताने वकृत्व स्पर्धा आयोजीत करुन विद्यार्थ्यांना रोख पारितोषीक व शैक्षणिक साहित्य बक्षिस  दिले जातात. संस्था अंतर्गत आयोजीत केलेल्या क्रिडास्पर्धां,विज्ञान प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, आनंद नगरी  यात शाळेचा सक्रिय सहभाग असतो. संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील व संचालक मंडळ वेळोवेळी शाळेला भेटी देऊन अडीअडचणी समजून घेतात मुख्याध्यापक व शिक्षकांना मार्गदर्शन करतात. शाळेला नासिक विभागाचे  शिक्षण उपसंचालक , जिल्हा शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, या मान्यवरांनी भेटी देऊन शालेय उपक्रमांचे कौतुक केले आहे. लासलगाव बिटाचे विस्तार अधिकारी वसंत गायकवाड व पालकवर्ग यांचेही मार्गदर्शन मिळत असते.
at February 24, 2020
1)
https://www.jagrutmaharashtra.com/article/

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्ताने..


 3)Sameer Deode Sirs Success story published inTejas stories of success book.
Lasalgaon...


Tejas stories of change book launched yesterday ilby honourable Ashishji Shelar minister of education,government of Maharashtra,Helen Silvester,director of British council and Satyajit asalian,TATA trust. Dr. Suvarna kharat Director RMSA  Hon.Dr.Subhash Kamble, Director Regional Authority, Aurangabad,Dr Ujjwal karwande,HODEnglish Department ,Dr.pramod kumawat Tejas project Head were present.
The Tejas Success story book published by government of maharashtra , British council and Tata trust. Under tejas project primary teachers of maharashtra received English language training from british  council . Sameer Deode teacher from jijamata prathmik shala ,Lasalgaon an ISO certified school working as teacher activities group co ordinators and facilitator  for English language. He was selected by British Council for three year in this program.
As a impact  of this project he gain more confidence and proffeciency in speaking English . He learnt how to use ICT tools in classroom teaching. He used different educational apps in teaching from Google play store.For example paper murge cube app to teach solar system. He use innovative techniques like showing videos on the school projector in digital classroom . He runs a you tube channel on innovative teaching practices . One of his poem received 1:5  lakh hits in one year. He he writes classroom teaching activities on his blog . Named English K.nowledge Hub.He also use different languages games and action songs in teaching.Has published a book on spoken English.for which he received an appreciation letter by the ex school education minister vinod Tawade Sir.
Yesterday I he presented the book written by him to Hon. Mr Ashish Shelar sir (Education Minister, Maharashtra Government)
16 tag co ordinators ,9 teachers and 10 parents success stories of change published in this book.among them Nashik Dciept Sarp Ashok Chavahn, sameer Deode from lasalgaon,Prashant Shinde,Suyog Dikshit  (Yeola)Rupali Atahre, Pratiksha Gaikwad  recieved this honour from Nashik District. For this success he had been congratulate by lasalgaon Shikshan Sahayak Mandals chairman Nanasaheb patil ,Deputy Nivrutti Gaikar , Secretary Sanjay patil , Director Sitaram Jagtap   pushpatai Darekar,Ranjana Tai patil  ,Neeta Tai Patil ,Shantanu patil ,Kailas Thombare,Laxman Mapari ,Institution chief executive officer Vaishnavi patil  School head Master Anis Kaji and all staff teachers .







              TEJAS PROJECT – ENGLISH IN THE CLASSROOM.

Writer – Mr.Sameer Kedu Deode
School – jijamata Prathmik Shala,Lasalgaon,Tal – Niphad , Dist – Nashik.
Email – sameerdeode@gmail.com
Whatsapp no – 7588556717
The TEJAS project is a joint initiative delivered through a partnership between the Government of Maharashtra, Tata Trusts and the British Council. It aims to improve the quality of English language learning in primary schools. Under this initiative, teachers form face-to-face and digital communities of practice in their local areas through Teacher Activity Groups (TAGs). This enables them to develop their language ability, teaching skills, knowledge and experience. TEJAS also aims to revitalise the State Institute of English, Aurangabad, so that is it equipped to independently plan, manage and support English training initiatives across the state. Under the current programme, Teacher Activity Groups  taken  place across nine districts in Maharashtra (Aurangabad, Beed, Hingoli, Nashik, Nandurbar, Nagpur, Gadchiroli, Amravati and Yavatmal).
    As am working with British Council as a Tejas Tag Co coordinator. I conduct Tag  meeting once a month for each cluster. I have three tags. Each tag has 25 teachers from z.p.priamry schools. By attending these meetings teachers gain more confidence in their ability to communicate effectively in English, especially in the classroom. They learn new ideas and teaching techniques to use in their teaching. Share their own experiences of teaching and learning English with other teachers. They find classroom resources, to create positive environment in classroom. How to motivate students to speak English with teacher and friends. Teachers learn how to create profile of their learners, to know strengths, skills and interests of learners.
            Teachers learn about their professional development. In four sections tag meeting is held.1) Language development – They focus on basic vocabulary and grammar, followed by activities to improve their speaking fluency. 2) Learning by watching – Tag co coordinator shows them some short classroom films. In these films teachers from Maharashtra trying learner centered activities in their lessons. How to use different language games in teaching.3) Learning by reading – In this section articles on topics related to English language teaching methods for primary classrooms. They include topics such as lesson planning, teaching large classes and motivating students. After reading group discussion and reflection tasks are taken.4) Reflection and action planning – This section is for reflect on the ideas of teachers which used in conducting activities. Teachers do the action planning for next month’s classroom teaching.
            In this way now tremendous changes are taking place in primary students. Students from z.p.primary schools speaking fluently English. They are playing different language games and activities in classroom as well playground. Teachers are making videos of their students and sharing social media, uploading on YouTube. Which helps to increase confidence of other teachers also. Others are trying these activities in their classroom. One strong media is our ATM groups which helps teachers to learn different English Language games and other things from each other.
LIVE ENGLISH, LOVE ENGLISH.
Thanks.











Sameer Kedu Deode
TEJAS TAG CO.ORDINATOR BRITISH COUNCIL
Sameerdeode11.blogspot.com




AINET  INTERNATIONAL TEACHER  REASEARCH CONFERENCE
                           NAGPUR,14-15 September – 2017
Writer – Mr.Sameer Kedu Deode
School – jijamata Prathmik Shala,Lasalgaon,Tal – Niphad , Dist – Nashik.
Email – sameerdeode@gmail.com
Whatsapp no – 7588556717


The TEJAS project is a joint initiative delivered through a partnership between the Government of Maharashtra, Tata Trusts and the British Council. It aims to improve the quality of English language learning in primary schools. Under this initiative, teachers form face-to-face and digital communities of practice in their local areas through Teacher Activity Groups (TAGs). This enables them to develop their language ability, teaching skills, knowledge and experience. TEJAS also aims to revitalise the State Institute of English, Aurangabad, so that is it equipped to independently plan, manage and support English training initiatives across the state. Under the current programme, Teacher Activity Groups  taken  place across nine districts in Maharashtra (Aurangabad, Beed, Hingoli, Nashik, Nandurbar, Nagpur, Gadchiroli, Amravati and Yavatmal).
    As am working with British Council as a Tejas Tag Co coordinator. Dear TAG Coordinators - Congratulations! I am very happy to inform you that you are selected for the AINET event in September at Nagpur.This email I received from British Council. Am great full to Res.Radhika Mam,Hon.Dr.Subash kamble,Res.Dr.Ujwal Karwande.Hon.Chairman Mr.Nanasaheb patil,Res.BEO Srm.Saroj Jagtap ,HM Mr.Anis Kaji. Its nice opportunity to me. Whatever I learn and presented in above conference am sharing with all of you.
Opening Plenary session by - Dr.Richard Smith. (University of Warwick US )
Topic- Teacher Research :What, When/Where,Why,Kind,How?
WHAT?
1.Plenary session really help me to reflect the importance of Teacher Research in ELT.
2.He started with  images of microscope and scientist performing research in laboratory. From ages we think that research is the work of scientist & engineer's but it's not true.
In our daily life we also do research, for e.g. If you have less amount in our pocket & want to travel long distance than you think of various transport available & check fares which fits to your pocket. This is also an example of research.
3.According to him Research is organised, systematic search for answers to the questions we ask.
4.Teacher research helps the teacher to know more about his classroom & help in developing his teaching.
5.He defines the teacher research as research done by teachers. Research initiated & carried out by teachers themselves into issues of importance to them in their own work. It is a research by teachers for themselves & their students.
WHEN/WHERE?
1.He shares some Teacher Research initiatives carried out by BC,IATEFL etc.
a. Aptis- Action Research Mentoring Scheme. ARMS)British Council. b.IATEFL Research SIG.
c. Teacher Conference Istanbul 2017 d.Champion Teacher Project in Chile.
KINDS
A. Action Research: action for change
1.Plan (a change) 2.Action (Implement the change) 3.Observe (evaluate the effects with date)
4.Reflect (Interpret what occurred)
B. Exploratory Action Research: action for understanding 'before' action of change.*
1.Plan to explore ( an issue)-Questions 2.Explore ( gather evidence)- Evidence
3.Evaluate ( with evidence ) - Evaluation
HOW?
1.By presenting & Sharing the research to community & getting feedback.
2.Making a good record- videos, pictures, publication.

Topic-2 Using Action Research for Professional Development by  Clover Bolton, who defined what the action plan is 1) It's practical issues/real world concerns. 2) Change for Improvement. 3) it's cyclical and Practitioner participation.
Action Research is NOT  Rigorous conformation to scientific protocols. Endless hours of library research. Someone telling you what is wrong with your teaching. You setting out to change the world.
She explained the types of Action Research
1.Individual Action Research 2. Collaborative Action Research 3.School wide Action Research
4. District wide Action Research
She mentioned action research steps which are cyclical
Plan- Act- Analyze- Conclude. She also noticed us about the formulating questions and SMART goals and Data Collection-qualitative and quantitative. Action Research is a cycle of continuous improvement and growth mindset. She  flashed some sample action research questions as well.. It's extremely enriching and exciting experience for me to be a part of this event.
Thanks.





Sameer Kedu Deode
TEJAS TAG CO.ORDINATOR BRITISH COUNCIL
Sameerdeode11.blogspot.com
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

1 comment:

  1. Swapnil khade18 February 2020 at 02:18

    Thanks, for such a great post. I have tried and found it really helpful. For more details to visit Best Principal in Nagpur

    ReplyDelete
    Replies
      Reply
Add comment
Load more...

Home
Subscribe to: Posts (Atom)

FIRST BLOG FOR ENGLISH LANGUAGE

Mr.Sameer Deode

Mr.Sameer Deode

WELCOME

What You Think About My Blog ?

Translate

Total Pageviews

News papers

  • All India news paper
  • Samachar
  • Hindustan times
  • Indian express
  • Lokmat times
  • India Today
  • Economic times
  • Daily Bhaskar
  • The Hindu
  • Times of India

Search This Blog

Inspiration

Inspiration
  • Home

IMPORTANT LINKS

  • Oxford dictionary
  • Dictionary
  • Wiki english
  • History of english
  • Learn magazine 10
  • BBC MAGAZINE
  • English magazine 1
  • English magazine
  • Learn english
  • ENGLISH EDU.
  • ESL 2
  • ESL
  • BRITISH COUNCIL
  • British council

SAMEER DEODE

sameerdeode
View my complete profile

Blog Archive

  • March 2020 (2)
  • February 2020 (2)
  • January 2020 (3)
  • November 2019 (1)
  • October 2019 (3)
  • September 2019 (6)
  • August 2019 (6)
  • July 2019 (12)
  • December 2018 (1)
  • November 2018 (1)
  • October 2018 (2)
  • January 2018 (9)
  • December 2017 (11)
  • November 2017 (33)
  • October 2017 (6)
  • September 2017 (8)
  • August 2017 (2)
  • July 2017 (13)
  • June 2017 (2)
  • May 2017 (42)
  • April 2017 (42)
  • Jijabai Shahaji Bhosale
    Jijabai Shahaji Bhosale (12 January 1598 – 17 June 1674), sometimes referred to as Rajmata Jijabai or even simply Jij...
  • MANAVSPRASH VISIT TO SNEHALAY AHAMDNAGAR ,GUHA ASHRAM RAHURI
  • MANAVSPARSH SOCIAL WORK

मुलांच्या विकासासाठी कार्यरत असलेला उपक्रमशिल शिक्षक ..समीर देवडे

Awesome Inc. theme. Theme images by molotovcoketail. Powered by Blogger.